शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

५० कोटींचा पीक विमा बँकांकडे वर्ग

By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST

परभणी : शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१६-१७ वर्षातील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. त्या शेतकऱ्यांच्या विमा रकमेपोटी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात लागणाऱ्या खत, औषधी, बी-बियाणे खरेदी करण्यास वाव मिळणार आहे़ जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता.जिल्ह्यात ५ लाख हेक्टरच्या वर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती़ परंतु, २०१६-१७ च्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस झाला. तसेच नियमित पावसानेही उघडीप दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर गतवर्षीच्या खरीप हंगामातही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता़ त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकाचा पीकविमा उतरविला होता़ २०१६-१७ या खरीप हंगामाच्या पीकविम्यापोटी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने जवळपास ५१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे़ त्यापैकी ५० कोटी ५८ लाख ६० हजार ३५५ रुपयांच्या पीकविम्याची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ ही रक्कम उपलब्ध करून दिल्यास औषधी, खत, बियाणे खरेदी करण्यास दिलासा मिळणार आहे़ शासनाने पीक कर्जासाठी अजूनही पुढाकार घेतला नाही़ त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत़ तेव्हा बँकांकडे उपलब्ध झालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़