शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोनामुक्त कागजीपुऱ्यात ४ थी ते ८ वीचे वर्ग सुरु; मित्रांच्यासोबतीने बालकांचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:07 IST

as corona's second wave decreased Schools Starts again : औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्दे शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

खुलताबाद ( औरंगाबाद ) : कोरोनामुक्त कागजीपुरा येथील जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी ते ८ वीचे वर्ग आज गुरूवारपासुन सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतस्तरावर संरप़च व शालेय समितीने कोरोना नियमांचे पालनकरून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये मित्रांच्यासंगतीने विद्यार्थ्यांनी उत्साहात आगमन केल्याचे चित्र होते. 

कोरोनामुक्त असलेल्या गावांत, सरपंचाच्या अध्यक्षतेखालील समितीचा ठराव घेऊन पालकांच्या लेखी संमतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनामुक्त ४४६ गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गुरुवारी पहिल्यांदा शाळांची घंटा वाजली. ग्रामीण भागात ५९५ गावांत ८५२ शाळा आहेत. १६ जूननंतर एकही कोरोनाचा रुग्ण न आढळलेली ४४६ गावे आहेत. शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

कागजीपुरा येथे सरपंचाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गाव शंभर टक्के कोरोनामुक्त गाव असल्यामुळे ४थी ते ८ वी पर्यंत वर्गसुरु करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीस सरपंच नाजरीन साजीद कुरैशी, उपसरपंच शेख अहेमद, तलाठी आर. डी. कराळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहमंद अलताफ हुसेन,वैद्यकीय अधिकारी डाॅ. बी. आर. पांडवे, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड,केंद्रप्रमुख के ई गायकवाड , मुख्याध्यापक आस्मा बीबी मोहमंद हाफीज उपस्थित होते. यानंतर आजपासून येथील शाळा सुरु करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आज ४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नियमानुसार अर्धे विद्यार्थी एकदिवसाआड बोलविण्यात येत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. 

गाव कोरोनामुक्त करणे आणि ठेवण्याचे असेल आव्हानजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाढ कमी असली तरी अद्यापही दोन अंकी वाढ सुरूच आहे,तर दोनशेहून अधिक गावे सध्याही बाधित आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, तर शाळा सुरू झाल्यावर गावात रुग्ण आढळला, तर शाळा बंद करण्यात येईल. त्यामुळे गावकऱ्यांवरही गाव कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आता असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळा