शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शहर पाणीपुरवठा योजनेचा ‘डीपीआर’ १५०० कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:32 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित ...

ठळक मुद्देसमांतर गुंडाळल्यानंतर नव्याने प्रस्ताव : मुख्यमंत्र्यांकडे लवकरच होणार बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने तयार केला आहे. या डीपीआरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर योजना राबविण्याचा निर्णय होणार आहे.शहरालगतचा परिसर आणि वाळूज-बजानगर भागात जलवाहिन्या, जलकुंभ उभारण्याचा नवीन डीपीआरमध्ये समावेश आहे. समांतर योजनेची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीसोबत न्यायालयाबाहेर तडजोड करणे मनपाला शक्य झाले नाही. त्यामुळे नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्यात शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १०२३ कोटी आणि सातारा-देवळाईसाठी ४०० कोटींचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठविला; परंतु शासनाने दोन्ही प्रस्ताव एकत्रितरीत्या पाठविण्याची सूचना केल्यानंतर पालिका प्रशासनाने नव्याने एकत्रित प्रस्ताव तयार केला. डीपीआरच्या अनुषंगाने महापौर दालनात बैठक झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, शासनाच्या सूचनेनुसार सातारा-देवळाईसह शहराचा सुधारित डीपीआर पीएमसीने तयार केला आला आहे. त्यामध्ये ज्या वसाहतीत अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियासह वाळूज-बजाजनगर परिसराचा समावेश आहे. प्रशासनाने डीपीआरच्या सादरीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नवीन योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे.२००५-०६ मध्ये समांतर जलवाहिनी योजनेची चर्चा सुरू झाली. २०१०-११ मध्ये ७९२ कोटींच्या योजनेसाठी कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट झाले. करारातील जाचक अटींमुळे योजना वादात अडकली. जून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी सभेच्या मान्यतेने पीपीपी करार रद्द करीत कंत्राटदार कंपनीचे काम थांबविले. यानंतर कंपनीने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.१० वर्षे झाले एक योजना पूर्ण होईना२००९ ते २०१९ समांतर जलवाहिनी योजनेचा प्रवास पाहता पाणीपुरवठ्याची महत्त्वाची योजना महापालिकेला पूर्ण करता आली नाही. सहा मनपा आयुक्त या काळात बदलून गेले; परंतु एकाच्याही कार्यकाळात योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न झाले नाहीत. राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी योजनेचे पाणी-पाणी झाले, त्यात प्रशासनही भरकटत गेले. परिणामी, ८०० कोटींची योजना १५०० कोटींपर्यंत गेली आहे. ७०० कोटी रुपयांनी योजना महागली आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील विस्काळीत पाणीपुरवठा आणि योजनेवरून शिवसेनेची प्रचंड नाकाबंदी झाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका