शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

शहर पाणीपुरवठा योजनेचा ‘डीपीआर’ १५०० कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:32 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित ...

ठळक मुद्देसमांतर गुंडाळल्यानंतर नव्याने प्रस्ताव : मुख्यमंत्र्यांकडे लवकरच होणार बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने तयार केला आहे. या डीपीआरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर योजना राबविण्याचा निर्णय होणार आहे.शहरालगतचा परिसर आणि वाळूज-बजानगर भागात जलवाहिन्या, जलकुंभ उभारण्याचा नवीन डीपीआरमध्ये समावेश आहे. समांतर योजनेची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीसोबत न्यायालयाबाहेर तडजोड करणे मनपाला शक्य झाले नाही. त्यामुळे नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्यात शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १०२३ कोटी आणि सातारा-देवळाईसाठी ४०० कोटींचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठविला; परंतु शासनाने दोन्ही प्रस्ताव एकत्रितरीत्या पाठविण्याची सूचना केल्यानंतर पालिका प्रशासनाने नव्याने एकत्रित प्रस्ताव तयार केला. डीपीआरच्या अनुषंगाने महापौर दालनात बैठक झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, शासनाच्या सूचनेनुसार सातारा-देवळाईसह शहराचा सुधारित डीपीआर पीएमसीने तयार केला आला आहे. त्यामध्ये ज्या वसाहतीत अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियासह वाळूज-बजाजनगर परिसराचा समावेश आहे. प्रशासनाने डीपीआरच्या सादरीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नवीन योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे.२००५-०६ मध्ये समांतर जलवाहिनी योजनेची चर्चा सुरू झाली. २०१०-११ मध्ये ७९२ कोटींच्या योजनेसाठी कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट झाले. करारातील जाचक अटींमुळे योजना वादात अडकली. जून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी सभेच्या मान्यतेने पीपीपी करार रद्द करीत कंत्राटदार कंपनीचे काम थांबविले. यानंतर कंपनीने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.१० वर्षे झाले एक योजना पूर्ण होईना२००९ ते २०१९ समांतर जलवाहिनी योजनेचा प्रवास पाहता पाणीपुरवठ्याची महत्त्वाची योजना महापालिकेला पूर्ण करता आली नाही. सहा मनपा आयुक्त या काळात बदलून गेले; परंतु एकाच्याही कार्यकाळात योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न झाले नाहीत. राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी योजनेचे पाणी-पाणी झाले, त्यात प्रशासनही भरकटत गेले. परिणामी, ८०० कोटींची योजना १५०० कोटींपर्यंत गेली आहे. ७०० कोटी रुपयांनी योजना महागली आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील विस्काळीत पाणीपुरवठा आणि योजनेवरून शिवसेनेची प्रचंड नाकाबंदी झाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका