शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शहराची सुरक्षा अप्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर; ९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:34 IST

शहर आणि परिसरातील मालमत्तांना आग लागण्याच्या घटना वर्षभरात किमान दीड ते दोन हजार होतात.

ठळक मुद्दे११३ कर्मचाऱ्यांपैक्की  १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाहीनवीन आकृतीबंधानुसार भरती होणार

औरंगाबाद : शहरातील १७ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागावर आहे. अग्निशमन विभागात सध्या ११३ कर्मचारी कार्यरत असून, त्यातील केवळ १३ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. २०१४पासून महापालिकेने अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच दिलेले नाही. यातील धक्कादायक बाब म्हणजे सध्या कार्यरत असलेले ८० टक्के कर्मचारी हे कंत्राटी आहेत.

शहर आणि परिसरातील मालमत्तांना आग लागण्याच्या घटना वर्षभरात किमान दीड ते दोन हजार होतात. त्यामुळे आग लागल्यानंतर सर्वात पहिला फोन अग्निशमन विभागाला येतो. या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे काम करतात. परंतु, शहरातील अग्निशमन विभागात तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारीच नाहीत. २०१४मध्ये महापालिकेने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. एका कर्मचाऱ्याला किमान सहा महिने याठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागते. नागपूर येथे प्रशिक्षण घेतलेले अवघे १३ कर्मचारी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. उर्वरित प्रशिक्षित कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मागील दोन दशकांपासून महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. अग्निशमन विभागात कायमस्वरूपी ४३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, सध्या ३९ रिक्त पदे असून, कंत्राटी पद्धतीवर जवळपास ७० कर्मचारी भरण्यात आले आहेत.

निधी नसल्याने यंत्रसामग्रीचा अभावशहरात इमारती गतीने वाढत आहेत. त्या तुलनेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे चौथ्या मजल्यापर्यंत जाण्याएवढी शिडीसुद्धा नाही.

९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नाहीअग्निशमन विभागात कुशल, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येते. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झालेले नाही त्यांना नागपूर येथील प्रशिक्षण संस्थेत पाठविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कर्मचाऱ्यांना कोणतेही शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलेले नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले नसल्यामुळे आग विझवणे, आपत्ती व्यवस्थापनात कशा पद्धतीने काम करावे याचा अनुभव नाही. औरंगाबाद महापालिकेकडे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे.

नवीन आकृतीबंधानुसार भरती होणारमहाराष्ट्र शासनाने महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधामध्ये २८१ पदांना मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी एकदा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यातील बहुतांश कर्मचारी आता निवृत्त झाले आहेत. नवीन पदभरतीनंतर पुन्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.- आर. के. सुरे, अग्निशमन अधिकारी, मनपा.

अग्निशमन विभागातील मंजूर रिक्त पदेपद - मंजूर - रिक्त - कंत्राटीमुख्य अग्निशमन अधिकारी - ०१ - ०० - ००टेन्शन ऑफिसर - ०१ - ०० - ००सुपर अग्निशमन अधिकारी - ०६ - ०३ - ००प्रमुख अग्निशामक - ०७ - ०० - ००ड्रायव्हर ऑपरेटर - १३ - ०५ - ००वाहनचालक - ०५ - ०५ - १०अग्निशामक - ३३ - १८ - ५२टेलिफोन ऑपरेटर - ०७ - ०५ - ०५कनिष्ठ लिपिक - ०२ - ०१ - ००

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद