शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला; आता रात्रंदिवस असतात चाळीस पथके गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:39 IST

घरफोड्या, वाहनचोरी आणि जबरी चोरी रोखण्यासाठी उचलले पाऊल

ठळक मुद्देविनाकारण क्षेत्र सोडून जाणाऱ्या पथकावर कडक कारवाईचे संकेतछायाचित्रे आणि गुगल मॅपद्वारे पोजिशनची माहिती वरिष्ठांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर

औरंगाबाद : शहरातील वाहनचोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र आणि पैशाच्या बॅगा पळविण्याच्या घटना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्तीचा पॅटर्न बदलला आहे. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यावर पोलीस दिसावे, याकरिता तब्बल ४० पथकांद्वारे शहरात गस्त सुरू केली. रस्त्यावर पोलीस दिसत असल्याने उन्ह्याळ्याच्या सुटीतील घरफोड्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली.

शहरात काही महिन्यांपूर्वी मंगळसूत्र चोरी, पैशाच्या बॅगा पळविणे, जबरी चोरी आणि वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. गतवर्षी आणि यावर्षी जानेवारीपासून झालेल्या घरफोड्या, वाहनचोऱ्या आणि जबरी चोरीच्या घटनेचे ठिकाण, वेळ याबाबतचा नकाशा तयार करून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी अभ्यास केला. तेव्हा सकाळी सहा ते साडेनऊपर्यंत आणि रात्री साडेआठ ते दहादरम्यान पोलिसांची शिफ्ट बदलण्याचा कालावधी असतो. या कालावधीत रस्त्यावर पोलीस नसतात, ही बाब गुन्हेगारांना चांगल्या प्रकारे माहिती असल्याने चोरटे या कालावधीत सक्रिय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पो.नि. सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीचा पॅटर्न बदलून टाकला. नव्या पॅटर्ननुसार आता रात्र पाळीच्या पोलिसांची गस्त पहाटे पाच वाजता समाप्त होताच दुसऱ्या पथकाला पहाटे पाच ते सकाळी ११ या कालवधीसाठी गस्तीवर उतरविण्यात येते. यानंतर अन्य पथक ११ पासून ते रात्री नऊपर्यंत गस्तीवर असतात. रात्रपाळीची गस्त मध्यरात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत असते. ही गस्त प्रभावी करण्यासाठी चाळीस पथके रस्त्यावर उतरविण्यात आले आहेत. यात पीसीआर मोबाईल कार आणि प्रत्येक ठाण्यातील वन मोबाईल, टू मोबाईल व्हॅनवरील कर्मचारी आणि बीट मार्शल यांच्या गस्तीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे पीसीआर मोबाईल व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून जेव्हाही क ॉल केला जाईल तेव्हा ते त्यांना नेमून दिलेल्या परिसरातच गस्त करताना आढळणे आवश्यक आहे. विनाकारण क्षेत्र सोडून जाणाऱ्या पथकावर कडक कारवाईचे संकेतही वरिष्ठांनी दिले.

व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवावे लागते छायाचित्रगुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी यांनी गस्तीत हलगर्जीपणा करू नये, याकरिता त्यांना ते करीत असलेल्या गस्तीवरील छायाचित्रे आणि गुगल मॅपद्वारे पोजिशनची माहिती वरिष्ठांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवावी लागते. गुरुवारी तब्बल १२० छायाचित्रे पो.नि. सावंत यांना गस्तीवरील पोलिसांनी पाठविली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी