शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

शहराला १३ अग्निशमन केंद्रांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:52 IST

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला.

ठळक मुद्देउपलब्ध फक्त तीन : दहा वर्षांपासून पाच नवीन केंद्र बांधण्याचा प्रस्ताव

औरंगाबाद : शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला. आजपर्यंत महापालिकेने एकही केंद्र उभारले नाही.शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी २५ ते ३० हजार नागरिकांची या शहरात भर पडत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. बांधकाम नियमावलीत शासन दरवर्षी आमूलाग्र बदल करीत आहे. जमिनीचा जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून उंच इमारती बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरात पूर्वी पाच मजली इमारतींचा ट्रेंड होता. मागील काही वर्षांमध्ये दहा मजलीपर्यंतही बांधकामे सुरू झाली आहेत. या उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी महापालिकेकडे अत्याधुनिक यंत्रणाच नाही. औरंगपुºयातील फटाका मार्केटला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यामुळे तत्कालीन अग्निशमन अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. प्रत्येक पाच किलोमीटरच्या परिघात किमान एक तरी अग्निशमन केंद्र असावे, असा निकष आहे. महापालिका सध्या पदमपुरा, सिडको आणि एमआयडीसी चिकलठाणा येथे तीन अग्निशमन केंद्रे चालवीत आहे. शहरात केंद्रांची संख्या वाढवावी म्हणून शासनानेही ५ कोटींचा निधीही दिला होता. या निधीचा बट्ट्याबोळ केल्यानंतर आता दोन कोटीच शिल्लक आहेत. एवढ्या तुटपुंज्या निधीत नवीन पाच केंद्रे बांधणे अशक्यप्राय आहे. जुना निधी खर्च झालेला नसताना शासनाकडे आणखी निधीची मागणी कशी करणार? शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास तब्बल १३ केंद्रे असायला हवीत. नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा जावईशोधही महापालिका प्रशासनाने लावला होता. अग्निशमन विभागासाठी नवीन पाच फायर टेंडर खरेदी करण्याचा मुद्याही मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.--------------

टॅग्स :fireआगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका