शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये आठवले, पप्पु कागदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे येऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पुरेसा पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार यात शंका नाही. सत्तेवर आल्यास विधायक निर्णय घेण्यात येतील असेही आठवले म्हणाले. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन वर्ष उलटले तरी मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही. ही अतिशय निंदनीय बाब असून आमची सत्ता आल्यास आरोपी पकडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. रिपाइं युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे म्हणाले, पावसाअभावी पिके उगवली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी. गायरान जमिनीसंर्दभाचा जीआर वाढवून तो २०१० चा त्यात समावेश करावा असे कागदे म्हणाले. राजाभाऊ सरवदे, कांतीकुमार जैन, डॉ. विजय गोरे, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, अमर कसबे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची भाषणे झाली. दलितांवरील अत्याचार रोखण्यात यावेत व दलितांना संरक्षण देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेला लागु करण्यात आलेली दारिद्रय रेषेची व पीआर कार्डची अट रद्द करावी, डीआरडीएकडील घरकुल योजना समाजकल्याणकडे वर्ग करावी, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, एससी, ओबीसी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी आदी मागण्या झाल्या़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. येथे आल्यानंतर त्यांची नेहमीच भेट व्हायची. त्यांचे अपघाती निधन मनाला चटक लावुन गेले. ते महायुतीचे शिल्पकार होते असे सांगत मुंडे यांनी मी खासदार व्हावा यासाठी आग्रही भुमिका बजावली होती, असे आठवले म्हणाले.