शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये आठवले, पप्पु कागदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे येऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पुरेसा पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार यात शंका नाही. सत्तेवर आल्यास विधायक निर्णय घेण्यात येतील असेही आठवले म्हणाले. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन वर्ष उलटले तरी मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही. ही अतिशय निंदनीय बाब असून आमची सत्ता आल्यास आरोपी पकडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. रिपाइं युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे म्हणाले, पावसाअभावी पिके उगवली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी. गायरान जमिनीसंर्दभाचा जीआर वाढवून तो २०१० चा त्यात समावेश करावा असे कागदे म्हणाले. राजाभाऊ सरवदे, कांतीकुमार जैन, डॉ. विजय गोरे, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, अमर कसबे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची भाषणे झाली. दलितांवरील अत्याचार रोखण्यात यावेत व दलितांना संरक्षण देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेला लागु करण्यात आलेली दारिद्रय रेषेची व पीआर कार्डची अट रद्द करावी, डीआरडीएकडील घरकुल योजना समाजकल्याणकडे वर्ग करावी, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, एससी, ओबीसी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी आदी मागण्या झाल्या़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. येथे आल्यानंतर त्यांची नेहमीच भेट व्हायची. त्यांचे अपघाती निधन मनाला चटक लावुन गेले. ते महायुतीचे शिल्पकार होते असे सांगत मुंडे यांनी मी खासदार व्हावा यासाठी आग्रही भुमिका बजावली होती, असे आठवले म्हणाले.