शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

शहरासाठी गतीने कामे केली

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

औरंगाबाद : औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराच्या विकासासाठी मला गतीने बरीचशी कामे करता आली.

औरंगाबाद : औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराच्या विकासासाठी मला गतीने बरीचशी कामे करता आली. बरेचसे काही करावयाचे राहूनही गेले. त्या योजना व कल्पना मला नागपुरात नक्कीच उपयोगी पडणार आहेत, असे उद्गार आज येथे औरंगाबाद मनपाचे मावळते आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांनी काढले. आपल्या वीस महिन्यांच्या कारकीर्दीत डॉ. कांबळे यांनी बाराशे कोटींच्या कामांची सुरुवात केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, एलईडी व मनपा शाळांच्या निकालात ८० टक्के वाढ, अशा काही ठळक बाबींचा उल्लेख करता येईल व यासाठी औरंगाबादकर नेहमीच त्यांना आठवणीत ठेवतील. संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. मानपत्र, शाल व पुष्पहार देऊन माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संत एकनाथ रंगमंदिर तुडुंब भरले होते. शिवाय अनेक संस्था- संघटना व व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहून डॉ. हर्षदीप कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. कांबळे यांच्या आई जोहर व वडील श्रीराम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.