शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शहर पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:43 IST

शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवीज यंत्रणेला फटका : वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.वादळी पावसामुळे साडेचार वाजेच्या सुमारास महावितरणच्या हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाºया ११ केव्हीच्या सिटीचौक, रोजाबाग, नेहरू भवन व गणेश कॉलनीतील वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीनंतर गणेश कॉलनी वगळता उर्वरित वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, कटकटगेट व सेव्हन हिल या भागात विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्ही वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने औरंगपुरा, निराला बाजार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.पावसामुळे सिडको व चिकलठाणा परिसरातही सायंकाळी दोन तास वीजपुरवठा बंद होता. ३३ केव्हीच्या ३ वाहिन्या बंद पडल्याने गारखेडा परिसर, समर्थनगर, पैठणगेट, रंगमंदिर, उस्मानपुरा, दूध डेअरी परिसरातही चार तास वीज नव्हती. छावणी, भावसिंगपुरा परिसरातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. जाधववाडी उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे आरतीनगर, पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर, पवननगर, आंबेडकरनगर या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणच्या अभियंते-कर्मचाºयांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला. परंतु अधिक नुकसान असलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.चौकट...दूरध्वनी ‘नॉट रिचेबल’ नागरिकांना समाधानकारक उत्तरे नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक महावितरणच्या दूरध्वनींवर संपर्क साधून वीज कधी येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, अनेक ठिकाणी दूरध्वनी उचलला जात नव्हता. दूरध्वनी उचलला गेला तर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार संपर्क करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.-----------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण