शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शहर पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:43 IST

शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवीज यंत्रणेला फटका : वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.वादळी पावसामुळे साडेचार वाजेच्या सुमारास महावितरणच्या हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाºया ११ केव्हीच्या सिटीचौक, रोजाबाग, नेहरू भवन व गणेश कॉलनीतील वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीनंतर गणेश कॉलनी वगळता उर्वरित वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, कटकटगेट व सेव्हन हिल या भागात विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्ही वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने औरंगपुरा, निराला बाजार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.पावसामुळे सिडको व चिकलठाणा परिसरातही सायंकाळी दोन तास वीजपुरवठा बंद होता. ३३ केव्हीच्या ३ वाहिन्या बंद पडल्याने गारखेडा परिसर, समर्थनगर, पैठणगेट, रंगमंदिर, उस्मानपुरा, दूध डेअरी परिसरातही चार तास वीज नव्हती. छावणी, भावसिंगपुरा परिसरातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. जाधववाडी उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे आरतीनगर, पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर, पवननगर, आंबेडकरनगर या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणच्या अभियंते-कर्मचाºयांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला. परंतु अधिक नुकसान असलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.चौकट...दूरध्वनी ‘नॉट रिचेबल’ नागरिकांना समाधानकारक उत्तरे नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक महावितरणच्या दूरध्वनींवर संपर्क साधून वीज कधी येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, अनेक ठिकाणी दूरध्वनी उचलला जात नव्हता. दूरध्वनी उचलला गेला तर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार संपर्क करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.-----------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण