शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शहर पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:43 IST

शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवीज यंत्रणेला फटका : वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.वादळी पावसामुळे साडेचार वाजेच्या सुमारास महावितरणच्या हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाºया ११ केव्हीच्या सिटीचौक, रोजाबाग, नेहरू भवन व गणेश कॉलनीतील वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीनंतर गणेश कॉलनी वगळता उर्वरित वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, कटकटगेट व सेव्हन हिल या भागात विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्ही वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने औरंगपुरा, निराला बाजार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.पावसामुळे सिडको व चिकलठाणा परिसरातही सायंकाळी दोन तास वीजपुरवठा बंद होता. ३३ केव्हीच्या ३ वाहिन्या बंद पडल्याने गारखेडा परिसर, समर्थनगर, पैठणगेट, रंगमंदिर, उस्मानपुरा, दूध डेअरी परिसरातही चार तास वीज नव्हती. छावणी, भावसिंगपुरा परिसरातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. जाधववाडी उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे आरतीनगर, पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर, पवननगर, आंबेडकरनगर या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणच्या अभियंते-कर्मचाºयांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला. परंतु अधिक नुकसान असलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.चौकट...दूरध्वनी ‘नॉट रिचेबल’ नागरिकांना समाधानकारक उत्तरे नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक महावितरणच्या दूरध्वनींवर संपर्क साधून वीज कधी येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, अनेक ठिकाणी दूरध्वनी उचलला जात नव्हता. दूरध्वनी उचलला गेला तर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार संपर्क करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.-----------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण