शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:54 IST

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीत जवळपास दोन हजार नागरिक राहतात. या वसाहतीला म्हाडा प्रशासन सिडकोकडून पाणी विकत घेवून ते पुरविते. तर या भागातील रहिवासी म्हाडाकडे पाणीबीलाचा भरणा करतात. वसुलीसाठी प्रशासनाने एक कर्मचारीही नेमला होता. पण, काही दिवसांपासून वसुली कर्मचारी येत नाही. त्यामुळे रहिवशाांना पाणीबिल भरण्यासाठी शहरातील म्हाडा कार्यालयात जावे लागत आहे.

येथील बहुतांशी लोक कामगार आहेत. कामाची व म्हाडा कार्यालयाची एकच वेळ असल्याने नागरिकांना वेळेवर बील भरणे अवघड होत आहे. काहींनी बीलाचा भरणा केला आहे. तर अनेकांकडे बील थकित आहे. थकित बिलाचा आकडा वाढल्याने प्रशासनाने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेळेवर बील भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

आठवडाभरापूर्वी येथील रहिवाशांनी म्हाडा प्रशासनाला भेटून पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती. पण संपूर्ण वसुली झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरु केला जाणार नाही, अशी भूमिका म्हाडा प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावर नागरिकांना वेठीस न धरता प्रशासनाने पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य वैशाली हिवाळे यांनी केली आहे.

पंधरा दिवसापासून निर्जळी..म्हाडा प्रशासनाने पाणी बंद केल्याने म्हाडा कॉलनीत मागील पंधरा दिवसापासून निर्जळी सुरु असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. त्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पैसे देवूनही वेळेवर पाण्याचे टँकर मिळत नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी शिवाजी हिवाळे, शिवाजी राऊत, संजय जगताप, दादासाहेब रगडे, दिनेश खिराडे, अशोक वानरे आदींनी केली आहे.दोन दिवसांत पाणीपुरवठा होणारपाणी बिलापोटी नागरिकांकडे १४ लाखांवर बील थकित आहे. वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक वेळेवर पैसे भरत नसल्याने हा आकडा वाढत आहे. बील न भरल्याने सिडकोने पाणीपुरवठा बंद केला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरु केला जाईल.- सुधाकर बाहेगावकर, उप अभियंता,म्हाडा--------------------------------------------- 

टॅग्स :water shortageपाणीकपातWalujवाळूज