शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:54 IST

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीत जवळपास दोन हजार नागरिक राहतात. या वसाहतीला म्हाडा प्रशासन सिडकोकडून पाणी विकत घेवून ते पुरविते. तर या भागातील रहिवासी म्हाडाकडे पाणीबीलाचा भरणा करतात. वसुलीसाठी प्रशासनाने एक कर्मचारीही नेमला होता. पण, काही दिवसांपासून वसुली कर्मचारी येत नाही. त्यामुळे रहिवशाांना पाणीबिल भरण्यासाठी शहरातील म्हाडा कार्यालयात जावे लागत आहे.

येथील बहुतांशी लोक कामगार आहेत. कामाची व म्हाडा कार्यालयाची एकच वेळ असल्याने नागरिकांना वेळेवर बील भरणे अवघड होत आहे. काहींनी बीलाचा भरणा केला आहे. तर अनेकांकडे बील थकित आहे. थकित बिलाचा आकडा वाढल्याने प्रशासनाने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेळेवर बील भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

आठवडाभरापूर्वी येथील रहिवाशांनी म्हाडा प्रशासनाला भेटून पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती. पण संपूर्ण वसुली झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरु केला जाणार नाही, अशी भूमिका म्हाडा प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावर नागरिकांना वेठीस न धरता प्रशासनाने पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य वैशाली हिवाळे यांनी केली आहे.

पंधरा दिवसापासून निर्जळी..म्हाडा प्रशासनाने पाणी बंद केल्याने म्हाडा कॉलनीत मागील पंधरा दिवसापासून निर्जळी सुरु असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. त्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पैसे देवूनही वेळेवर पाण्याचे टँकर मिळत नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी शिवाजी हिवाळे, शिवाजी राऊत, संजय जगताप, दादासाहेब रगडे, दिनेश खिराडे, अशोक वानरे आदींनी केली आहे.दोन दिवसांत पाणीपुरवठा होणारपाणी बिलापोटी नागरिकांकडे १४ लाखांवर बील थकित आहे. वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक वेळेवर पैसे भरत नसल्याने हा आकडा वाढत आहे. बील न भरल्याने सिडकोने पाणीपुरवठा बंद केला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरु केला जाईल.- सुधाकर बाहेगावकर, उप अभियंता,म्हाडा--------------------------------------------- 

टॅग्स :water shortageपाणीकपातWalujवाळूज