शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:54 IST

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीत जवळपास दोन हजार नागरिक राहतात. या वसाहतीला म्हाडा प्रशासन सिडकोकडून पाणी विकत घेवून ते पुरविते. तर या भागातील रहिवासी म्हाडाकडे पाणीबीलाचा भरणा करतात. वसुलीसाठी प्रशासनाने एक कर्मचारीही नेमला होता. पण, काही दिवसांपासून वसुली कर्मचारी येत नाही. त्यामुळे रहिवशाांना पाणीबिल भरण्यासाठी शहरातील म्हाडा कार्यालयात जावे लागत आहे.

येथील बहुतांशी लोक कामगार आहेत. कामाची व म्हाडा कार्यालयाची एकच वेळ असल्याने नागरिकांना वेळेवर बील भरणे अवघड होत आहे. काहींनी बीलाचा भरणा केला आहे. तर अनेकांकडे बील थकित आहे. थकित बिलाचा आकडा वाढल्याने प्रशासनाने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेळेवर बील भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

आठवडाभरापूर्वी येथील रहिवाशांनी म्हाडा प्रशासनाला भेटून पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती. पण संपूर्ण वसुली झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरु केला जाणार नाही, अशी भूमिका म्हाडा प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावर नागरिकांना वेठीस न धरता प्रशासनाने पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य वैशाली हिवाळे यांनी केली आहे.

पंधरा दिवसापासून निर्जळी..म्हाडा प्रशासनाने पाणी बंद केल्याने म्हाडा कॉलनीत मागील पंधरा दिवसापासून निर्जळी सुरु असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. त्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पैसे देवूनही वेळेवर पाण्याचे टँकर मिळत नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी शिवाजी हिवाळे, शिवाजी राऊत, संजय जगताप, दादासाहेब रगडे, दिनेश खिराडे, अशोक वानरे आदींनी केली आहे.दोन दिवसांत पाणीपुरवठा होणारपाणी बिलापोटी नागरिकांकडे १४ लाखांवर बील थकित आहे. वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक वेळेवर पैसे भरत नसल्याने हा आकडा वाढत आहे. बील न भरल्याने सिडकोने पाणीपुरवठा बंद केला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरु केला जाईल.- सुधाकर बाहेगावकर, उप अभियंता,म्हाडा--------------------------------------------- 

टॅग्स :water shortageपाणीकपातWalujवाळूज