शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 17, 2022 16:04 IST

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : तुम्ही स्वत:लाच विचारा की, आपण मागील किती महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही जण सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे. मागील वर्षभरात शहरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम, आधीच बँकेच्या कॅश काऊंटरवर झाला होता, आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.

एटीएमच्या गर्दीवर परिणाममहाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाही.

पगार खिशात नव्हे मोबाइलमध्येचवर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएममधून काढून घरी आणत. मात्र, आता अनेक जण महिनोन महिने एटीएममध्ये जातच नाहीत. चिल्लर व्यवहारही यूपीआयद्वारे केले जात आहे. यामुळे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहे.

एटीएम कार्ड विसरण्याचे प्रमाण वाढलेबँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ४३ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात.

सर्वाधिक एटीएम एसबीआयचेचजिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ३१७ एटीएम आहेत. त्यापैकी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे २२७ एटीएम आहेत. १६ खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १२५ एटीएम आहेत.

व्यवहारात वाढला ‘यूपीआय’ वापरदेशात सध्या दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे महिन्यातील आकडेवारी १० लाख कोटी होती.

कॅश काऊंटरवर ५० टक्के परिणामएटीएम आल्यापासून बँकेतील कॅश काऊंटरवर २० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला होता. आता यूपीआयमुळे कॅश काऊंटरवरील रोख रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयइए

अजून नाही परिणामएसबीआयच्या टाऊन सेंटर येथील एटीएमवर अजून युपीआयचा तेवढा परिणाम झाला नाही. आम्हाला दिवसातून दोन वेळेस एटीएममध्ये रक्कम भरावी लागते.- इम्तियाज परवेज, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय टाऊन सेंटर शाखा

डिजिटल व्यवहाराकडे वाढता कलडिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशाची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. डिजिटल क्रांती घडत आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

पेट्रोल पंपावर ५० टक्के व्यवहार डिजिटलमागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या पेट्रोल पंपावर दररोज होणारे व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत आहे.- अखिल अब्बास, पेट्रोल पंप मालक

जिल्ह्यात ५६६ एटीएमबँक             --- एटीएमपब्लिक सेक्टर बँक -- ३१७प्रायव्हेट बँक---२३९स्मॉल फायनान्स बँक--०७महाराष्ट्र ग्रामीण बँक --- ०१जिल्हा मध्यवर्ती बँक-- ०२(जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त आकडेवारी)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादatmएटीएमbankबँक