शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 17, 2022 16:04 IST

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : तुम्ही स्वत:लाच विचारा की, आपण मागील किती महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही जण सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे. मागील वर्षभरात शहरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम, आधीच बँकेच्या कॅश काऊंटरवर झाला होता, आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.

एटीएमच्या गर्दीवर परिणाममहाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाही.

पगार खिशात नव्हे मोबाइलमध्येचवर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएममधून काढून घरी आणत. मात्र, आता अनेक जण महिनोन महिने एटीएममध्ये जातच नाहीत. चिल्लर व्यवहारही यूपीआयद्वारे केले जात आहे. यामुळे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहे.

एटीएम कार्ड विसरण्याचे प्रमाण वाढलेबँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ४३ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात.

सर्वाधिक एटीएम एसबीआयचेचजिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ३१७ एटीएम आहेत. त्यापैकी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे २२७ एटीएम आहेत. १६ खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १२५ एटीएम आहेत.

व्यवहारात वाढला ‘यूपीआय’ वापरदेशात सध्या दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे महिन्यातील आकडेवारी १० लाख कोटी होती.

कॅश काऊंटरवर ५० टक्के परिणामएटीएम आल्यापासून बँकेतील कॅश काऊंटरवर २० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला होता. आता यूपीआयमुळे कॅश काऊंटरवरील रोख रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयइए

अजून नाही परिणामएसबीआयच्या टाऊन सेंटर येथील एटीएमवर अजून युपीआयचा तेवढा परिणाम झाला नाही. आम्हाला दिवसातून दोन वेळेस एटीएममध्ये रक्कम भरावी लागते.- इम्तियाज परवेज, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय टाऊन सेंटर शाखा

डिजिटल व्यवहाराकडे वाढता कलडिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशाची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. डिजिटल क्रांती घडत आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

पेट्रोल पंपावर ५० टक्के व्यवहार डिजिटलमागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या पेट्रोल पंपावर दररोज होणारे व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत आहे.- अखिल अब्बास, पेट्रोल पंप मालक

जिल्ह्यात ५६६ एटीएमबँक             --- एटीएमपब्लिक सेक्टर बँक -- ३१७प्रायव्हेट बँक---२३९स्मॉल फायनान्स बँक--०७महाराष्ट्र ग्रामीण बँक --- ०१जिल्हा मध्यवर्ती बँक-- ०२(जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त आकडेवारी)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादatmएटीएमbankबँक