शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिडकोवासीयांना नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:06 IST

कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-६ येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कब्रस्तानालगत असलेल्या सेंट्रल नाक्याला पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरानाका करून टाकले आहे. कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे. मनपा, राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिडकोतील नागरिक ‘कचरानाक्या’च्या विरोधात जनआंदोलनाच्या तयारीत आहेत.१२२ दिवसांपासून शहरातील कच-याच्या प्रक्रियेसाठी काहीही निर्णय झालेला नाही. २१ फेबु्रवारी रोजी मनपाने नारेगाव, मांडकी परिसरातील आंदोलकांना १५० दिवसांत कच-यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. १२२ दिवस संपले आहेत, अजून पालिकेला काहीही करता आलेले नाही. त्यामुळे नारेगावच्या आंदोलकांनी मनपावर जो अविश्वास दाखविला होता, तो खरा होता की काय, असे वाटू लागले आहे.पावसामुळे शहरातील कच-याचे ढीग कुजू लागले आहेत. १२२ दिवसांत मनपाने वाटेल तेथे डम्पिंग ग्राऊंड केले आहे. त्यामुळे त्या कच-यातून आता चोहोबाजूने दुर्गंधी सुटली आहे. जोरदार पाऊस झाला तर शहरातील प्रत्येक कानाकोप-यातून पुरलेला व साचलेला कचरा रोगराईयुक्त हवा निर्माण करील. ज्यामुळे मोठी समस्या शहराला भेडसावील. महिला व बाल आरोग्य कच-याच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. दिवसभर सिडकोतील एन-१, बजरंग चौकापर्यंत तर इकडे आझाद चौकापर्यंत कच-याची दुर्गंधी पसरते आहे. भर लोकवस्तीमध्ये कचरा डेपो असला तरी त्यावर प्रक्रिया करण्याची तसदी पालिका घेत नसल्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नcidco aurangabadसिडको औरंगाबाद