शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिडको महानगर-२ : पाच दिवसांआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:50 IST

पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगर - २ मध्ये पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून कोट्यापेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी पाच एमएलडीची असून, पुरवठा तीन एमएलडीचा होत असल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे.

सिडको वाळूज महानगर परिसरात प्रशासन एमआयडीसीकडून पाणी घेऊन रहिवासी भागात पाणी पुरवठा करते. काही दिवसांपूर्वी सिडको वाळूज महानगरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, नागरी वसाहती वाढल्यामुळे सिडकोने तीन दिवसांआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. या भागातील रहिवाशांना आठवड्यात फक्त दोनच दिवस पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीकडून सिडकोला गुरुवारी पाणी पुरवठा झाला नव्हता.

त्यामुळे सिडकोचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले. आता तर पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याची ओरड रहिवाशांतून होत आहे. तसेच बोअर व हातपंपाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नागरिकांना सिडकोच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते. पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा व तक्रारी करुनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा सिडको प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नारायण हातोळे, राजेश देशमुख, कैलास निकम, संजय भंगाळे, श्रीराम गायकवाड, उद्धव शेळके, किशोर पाटील, कैलास यादव, बाळासाहेब पाटील, कृष्णा पवार, प्रल्हाद बोबडे, अ‍ॅड.तांदुळजे, श्रीराम गायकवाड, भारत जाधव, सखाराम चव्हाण, प्रकाश वाघ, दिंगबर निकम आदींनी दिला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWalujवाळूजcidcoसिडको