शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:41 IST

महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल.

- राम शिनगारे  

औरंगाबाद : कवी आणि कविता म्हटलं की, एखाद्याचे मोठे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते. पृथ्वीसह आसमंत व्यापून टाकणारी त्याची शब्दरचना आपल्याला ठाऊक आहे.  महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. औरंगाबादजवळच्या भिंदोन शाळेत मात्र दप्तरातील कवी आहेत. हो हो.. दप्तरातील कवी. 

डोंगरात वसलेल्या भिंदोन या छोटेखानी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे दप्तरातील कवी आहेत. हे कवी म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थीच आहेत. अगदी चौथीच्या वर्गापासून ते सातवीपर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे कवी आहेत. विद्यार्थ्यांच्या या कवितांचा संग्रह नुकताच ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालाय. ‘दप्तरातील स्पंदन’ असे या कवितासंग्रहाचे नाव. विद्यार्थ्यांच्या ६० कविता ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी केला.  

शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भिंदोन हे गाव आहे. या गावात असलेल्या जि.प.च्या शाळेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतील विद्यार्थी कविता, कथा, नाटकांची रचना करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांपैकी काही कवितांची निवड करत ‘दप्तरातील स्पंदन’ हा छोटेखानी कवितासंग्रह शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेतून तयार केला. या कवितासंग्रहाचे नुकतेच प.सं. सदस्य अनुराग शिंदे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या बालकवीच्या जाणिवांचा विस्तार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे मातीशी ओलेपण जपणं पाण्याला सांगावं लागत नाही. त्याचप्रमाणे कविमनाचे शिक्षक असतील, तर स्वत:कडील गुण इतरांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. 

यातून शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना कवितांच्या रचना करण्यास प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थी कवितांच्या निर्मितीसाठी विचार करू लागले. मानवी जीवनातील संवेदनांच्या बिजारोपणास सुरुवात झाली. विज्ञानाच्या तंत्रासोबतच जगण्याचे मंत्रही आत्मसात करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत गेली असल्याचे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक विकास व्हावा, आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ कवींना लाजवेल, अशा प्रकारच्या कवितांची रचना केली असल्याचेही राऊत म्हणाल्या. शाळेतील सहकारी शिक्षक  कैलास गायकवाड, अरुणा ठाकुर, प्रतापसिंग जारवाल, रियाज मोहंमद शेख, संजय निकम, रेखा जारवाल, सुलभा मुळे, शिरोडकर, पल्लवी गजेवार, गणेश नलावडे आदींचे सहकार्य लाभले.

२५ मुले कविता करतातभिंदोनच्या शाळेतील २५ मुले कविता करतात. याशिवाय कथा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता तयार करतात, सामाजिक विषयांवरही लेखन करतात. विद्यार्थी जेव्हा लिहून दाखवतात. तेव्हा त्यातील चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जातात, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. प्रकाशित झालेल्या ग्रंथात वैशाली काकासाहेब क्षीरसागर (सातवी), शिवकन्या बद्रिनाथ शिंदे (सातवी), प्राजक्ता पांडुरंग पटेकर (सातवी), ऋतुजा राधाकिसन धोत्रे (सहावी), परवेज मुसा शेख (सातवी), महेश भानुदास शिंदे (सातवी), साईराम दिलीप शिंदे (सहावी), आदित्य बाबू आगळे (सहावी), आरती वैजनाथ शिंदे (सातवी) यांच्या कविता आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनAurangabadऔरंगाबादSchoolशाळा