शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:41 IST

महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल.

- राम शिनगारे  

औरंगाबाद : कवी आणि कविता म्हटलं की, एखाद्याचे मोठे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते. पृथ्वीसह आसमंत व्यापून टाकणारी त्याची शब्दरचना आपल्याला ठाऊक आहे.  महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. औरंगाबादजवळच्या भिंदोन शाळेत मात्र दप्तरातील कवी आहेत. हो हो.. दप्तरातील कवी. 

डोंगरात वसलेल्या भिंदोन या छोटेखानी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे दप्तरातील कवी आहेत. हे कवी म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थीच आहेत. अगदी चौथीच्या वर्गापासून ते सातवीपर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे कवी आहेत. विद्यार्थ्यांच्या या कवितांचा संग्रह नुकताच ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालाय. ‘दप्तरातील स्पंदन’ असे या कवितासंग्रहाचे नाव. विद्यार्थ्यांच्या ६० कविता ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी केला.  

शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भिंदोन हे गाव आहे. या गावात असलेल्या जि.प.च्या शाळेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतील विद्यार्थी कविता, कथा, नाटकांची रचना करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांपैकी काही कवितांची निवड करत ‘दप्तरातील स्पंदन’ हा छोटेखानी कवितासंग्रह शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेतून तयार केला. या कवितासंग्रहाचे नुकतेच प.सं. सदस्य अनुराग शिंदे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या बालकवीच्या जाणिवांचा विस्तार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे मातीशी ओलेपण जपणं पाण्याला सांगावं लागत नाही. त्याचप्रमाणे कविमनाचे शिक्षक असतील, तर स्वत:कडील गुण इतरांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. 

यातून शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना कवितांच्या रचना करण्यास प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थी कवितांच्या निर्मितीसाठी विचार करू लागले. मानवी जीवनातील संवेदनांच्या बिजारोपणास सुरुवात झाली. विज्ञानाच्या तंत्रासोबतच जगण्याचे मंत्रही आत्मसात करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत गेली असल्याचे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक विकास व्हावा, आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ कवींना लाजवेल, अशा प्रकारच्या कवितांची रचना केली असल्याचेही राऊत म्हणाल्या. शाळेतील सहकारी शिक्षक  कैलास गायकवाड, अरुणा ठाकुर, प्रतापसिंग जारवाल, रियाज मोहंमद शेख, संजय निकम, रेखा जारवाल, सुलभा मुळे, शिरोडकर, पल्लवी गजेवार, गणेश नलावडे आदींचे सहकार्य लाभले.

२५ मुले कविता करतातभिंदोनच्या शाळेतील २५ मुले कविता करतात. याशिवाय कथा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता तयार करतात, सामाजिक विषयांवरही लेखन करतात. विद्यार्थी जेव्हा लिहून दाखवतात. तेव्हा त्यातील चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जातात, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. प्रकाशित झालेल्या ग्रंथात वैशाली काकासाहेब क्षीरसागर (सातवी), शिवकन्या बद्रिनाथ शिंदे (सातवी), प्राजक्ता पांडुरंग पटेकर (सातवी), ऋतुजा राधाकिसन धोत्रे (सहावी), परवेज मुसा शेख (सातवी), महेश भानुदास शिंदे (सातवी), साईराम दिलीप शिंदे (सहावी), आदित्य बाबू आगळे (सहावी), आरती वैजनाथ शिंदे (सातवी) यांच्या कविता आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनAurangabadऔरंगाबादSchoolशाळा