शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पहिल्या स्थलांतरित वसाहतीने नाव कमावले; नामांतर कॉलनीत मजुरांची मुले बनली डॉक्टर, उद्योजक

By साहेबराव हिवराळे | Updated: October 21, 2023 14:40 IST

शहरातील पहिली स्थलांतरित वसाहत; सिडको-हडकोच्या बरोबरीत उभारणी

छत्रपती संभाजीनगर : चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी शहरातील एका वसाहतीचे स्थलांतर करावे लागले. तत्कालीन आयुक्तांनी सिडको-हडकोतील जागा देऊन सिद्धार्थनगर नावाने नवी वसाहत उभी केली. नामांतर चळवळीतील पीडित कुटुंबीयांना येथे जागा देण्यात आली. त्यास ‘नामांतर कॉलनी’ असे नाव देण्यात आले. आता येथील मजुरांची, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुले शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलिस, उद्योजक बनत असल्याचा अभिमान येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

अगदी लहान घरांत आपण गरिबीत असलो, तरी मुलांना शिक्षण, संस्कार देऊन मोठे करण्याचा संकल्प रहिवाशांनी तडीस नेऊन दाखवला. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होत आहेत. विहारात धार्मिक व संस्कार शिबिरांतून युवक-युवतींसाठी संस्कारक्षम वातावरण बनले आहे. आयटी व काॅर्पोरेट, बँकिंग सेक्टरकडे येथील युवक वळलेले आहेत. बांधकाम मजूर आता मोठे ठेकेदार बनले आहेत.

शिक्षणामुळे युवकांची पावले प्रगतीच्या दिशेने...सिद्धार्थनगराची जडणघडण होताना अनेक अडचणींतून मार्ग काढताना कष्ट सहन करावे लागले. जीवनात परिश्रमाशिवाय काही नाही; परंतु विविध लोकप्रतिनिधींनी सढळ हाताने केलेल्या मदतीने सिद्धार्थनगराचा विकास साध्य करता आला. रस्त्यापासून ते सांडपाणी इतर सर्वच व्यवस्थापन झालेले नव्हते. आता सर्वच व्यवस्थित झालेले असून, शिक्षणामुळे युवकांची पावले प्रगतीच्या दिशेने आहेत.-दौलत खरात (सामाजिक कार्यकर्ते)

मनपाकडून प्रयत्न केले...शहरातील ही पहिली सिडकोच्या बाजूला प्रशासनाने वसवलेली वसाहत आहे. कालांतराने परिसराचा विकास होत गेला अन् आता दुर्लक्षित असलेल्या परिसरात लोकप्रतिनिधी, तसेच मनपाच्या माध्यमातून योजना आणून सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. सर्वच स्थानिक नगरसेवकांचाही खारीचा वाटा नामांतर कॉलनी व सिद्धार्थनगरसाठी महत्त्वाचाच ठरलेला आहे.- कुसुम खरात (माजी नगरसेविका)

शिक्षणावर जोर दिला...कष्टकऱ्यांची मुलं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे मुलांच्या मनात बिंबविल्याने येथील काहीअंशी युवक शिक्षण तंत्रज्ञानाच्या मदतीने बँक, तसेच काॅर्पोरेक्ट सेक्टरपर्यंत नोकरीसाठी पोहोचत आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या दिशेनेही युवकांची वाटचाल आहे.- पंडित बोर्डे (समाजसेवक)

उद्योजकता प्रशिक्षण सुरू करावेसुशिक्षित युवकांना रोजगार उभा करण्यासाठी येथे शासनातर्फे रोजगारासाठी प्रशिक्षण उपक्रम राबवून त्यांना बँकेच्या सहकार्याने उद्योग निर्मितीसाठी सहकार्याची अपेक्षा आहे. बँकांकडून कर्ज देण्यासाठी लादण्यात येणाऱ्या अटी कमी करण्याची गरज आहे. जेणेकरून झोपडपट्टीतील युवकही उद्योजक बनतील. - शरद काकडे (रहिवासी)

सफाई होते, डीपीवर झाडंझुडपं तोडणार कोण...सिद्धार्थ नगर परिसरात सफाई होते. परंतु, झाडाझुडपांनी डीपीला वेढा घातला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातून अनेकदा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. त्याकडे महावितरण किंवा मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न आहे.- बुद्धिराज सोनवणे (रहिवासी)

पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्या...पाणीपुरवठ्यावर मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. आठ आठ दिवसाने पाणीपुरवठा तोही अपुऱ्या स्वरूपात होतो. त्यातून बहुतांश गल्लीत दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वाढलेली आहे. नागरिकांना अनेकदा जारच्या पाण्यावरही तहान भागविण्याची वेळ येते. - महेंद्र बोर्डे (रहिवासी)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद