शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:15 IST

पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही. उलट मराठवाड्याचा ‘हळूहळू’ सर्वांगीण विकास होतोय असे सांगत नागरिकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी सुरू झालेली आहे. आणखी किती महिने ही कोंडी राहील याचा नेम नाही. सध्या शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. पावसामुळे हा कचरा सडत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.ज्या भागात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीने मरण यातनाच सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेने कचराकोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या, प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शासनाने आयुक्त म्हणून महापालिकेत डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक केली. मागील दोन महिन्यांत आयुक्तांनाही कचराकोंडीत छाप पाडता आली नाही. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दीर्घ निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कचºयाचा प्रश्न अधिक बिकट आणि जटिल बनला आहे.शहर कचºयाने हैराण असताना शनिवारी मुख्यमंत्री शहरात आले. औरंगाबाद खंडपीठ व पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते कचराकोंडीवर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे महापालिकेसह औैरंगाबादकरांचा भ्रमनिराश झाला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही त्यांनी कचराकोंडीला सोयिस्करपणे बगल दिली.शहराने भाजपला काय दिले?च्मागील २० वर्षांमध्ये शहराने भाजपला भरभरून दिले आहे. १९९५ मध्ये भाजपचे फक्त ७ नगरसेवक होते. आज ही संख्या २६ पर्यंत गेली. हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांना विधानसभेत पाठविले. खा. रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेत पाठविण्यासाठी शहराच्या काही मतदारांनी मदत केलीच आहे. एवढे सर्व दिल्यानंतर औैरंगाबादकरांच्या भाजपकडून बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcity chowkसिटी चौक