शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:15 IST

पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही. उलट मराठवाड्याचा ‘हळूहळू’ सर्वांगीण विकास होतोय असे सांगत नागरिकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी सुरू झालेली आहे. आणखी किती महिने ही कोंडी राहील याचा नेम नाही. सध्या शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. पावसामुळे हा कचरा सडत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.ज्या भागात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीने मरण यातनाच सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेने कचराकोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या, प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शासनाने आयुक्त म्हणून महापालिकेत डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक केली. मागील दोन महिन्यांत आयुक्तांनाही कचराकोंडीत छाप पाडता आली नाही. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दीर्घ निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कचºयाचा प्रश्न अधिक बिकट आणि जटिल बनला आहे.शहर कचºयाने हैराण असताना शनिवारी मुख्यमंत्री शहरात आले. औरंगाबाद खंडपीठ व पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते कचराकोंडीवर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे महापालिकेसह औैरंगाबादकरांचा भ्रमनिराश झाला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही त्यांनी कचराकोंडीला सोयिस्करपणे बगल दिली.शहराने भाजपला काय दिले?च्मागील २० वर्षांमध्ये शहराने भाजपला भरभरून दिले आहे. १९९५ मध्ये भाजपचे फक्त ७ नगरसेवक होते. आज ही संख्या २६ पर्यंत गेली. हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांना विधानसभेत पाठविले. खा. रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेत पाठविण्यासाठी शहराच्या काही मतदारांनी मदत केलीच आहे. एवढे सर्व दिल्यानंतर औैरंगाबादकरांच्या भाजपकडून बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcity chowkसिटी चौक