शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मुख्यमंत्र्यांची कचराकोंडीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:15 IST

पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र, शहरातील दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचºयाचा ‘क’ शब्दही उच्चारला नाही. उलट मराठवाड्याचा ‘हळूहळू’ सर्वांगीण विकास होतोय असे सांगत नागरिकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी सुरू झालेली आहे. आणखी किती महिने ही कोंडी राहील याचा नेम नाही. सध्या शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. पावसामुळे हा कचरा सडत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.ज्या भागात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीने मरण यातनाच सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेने कचराकोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या, प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शासनाने आयुक्त म्हणून महापालिकेत डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक केली. मागील दोन महिन्यांत आयुक्तांनाही कचराकोंडीत छाप पाडता आली नाही. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दीर्घ निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कचºयाचा प्रश्न अधिक बिकट आणि जटिल बनला आहे.शहर कचºयाने हैराण असताना शनिवारी मुख्यमंत्री शहरात आले. औरंगाबाद खंडपीठ व पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते कचराकोंडीवर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे महापालिकेसह औैरंगाबादकरांचा भ्रमनिराश झाला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असतानाही त्यांनी कचराकोंडीला सोयिस्करपणे बगल दिली.शहराने भाजपला काय दिले?च्मागील २० वर्षांमध्ये शहराने भाजपला भरभरून दिले आहे. १९९५ मध्ये भाजपचे फक्त ७ नगरसेवक होते. आज ही संख्या २६ पर्यंत गेली. हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांना विधानसभेत पाठविले. खा. रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेत पाठविण्यासाठी शहराच्या काही मतदारांनी मदत केलीच आहे. एवढे सर्व दिल्यानंतर औैरंगाबादकरांच्या भाजपकडून बºयाच अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcity chowkसिटी चौक