शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

मुख्यमंत्री महाराष्ट्रच ठरवणार

By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST

जळकोट : महाराष्ट्रावर निजामशहा, अदिलशहा यांनी आक्रमणे करुन पाहिली़ परंतु, या शहांना महाराष्ट्राने पळता भुई थोडी केली़ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणे अमित शहा ठरविणार आहेत़

जळकोट : महाराष्ट्रावर निजामशहा, अदिलशहा यांनी आक्रमणे करुन पाहिली़ परंतु, या शहांना महाराष्ट्राने पळता भुई थोडी केली़ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणे अमित शहा ठरविणार आहेत़ या मोदी, शहांचे तसेच हाल करुन गुजरात नव्हे तर महाराष्ट्र आपला मुख्यमंत्री निवडण्यास सक्षम असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन राकाँचे नेते आऱआऱ पाटील यांनी मंगळवारी जळकोट येथे केले़उदगीर मतदारसंघातील राकाँचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ जळकोट शहरात आऱ आऱ पाटील यांनी सभा घेतली़ या निवडणुकीत राष्ट्रवादीची स्पर्धा केवळ भाजपाशी असल्याचे सांगून आबांनी मोदींवर हल्लाबोल केला़ आमच्यावर सिंचन घोट्याळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपाने गुजरातमधील ६ हजार कोटींचा नर्मदा प्रकल्प ३८ हजार कोटींवर नेणाऱ्या सरकारवर का मूग गिळले, असा सवाल आबांनी केला़ भाजपाकडे प्रादेशिक नेतृत्वच नसल्याने मोदींना तालुकास्तरावर फिरावे लागत असल्याची खिल्लीही आबांनी उडविली़ महाराष्ट्राचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार, धोरण राष्ट्रवादीकडेच असल्याने या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आऱआऱ पाटील यांनी केले़ मंचावर रायुकाँचे उमेश पाटील, उमेदवार संजय बनसोडे, रामराव राठोड, चंदन पाटील, नवनाथ गायकवाड, भरत पाटील, राम हाडोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती़(वार्ताहर)