शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुख्यमंत्री पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करताहेत : निलंगेकर

By admin | Updated: September 4, 2015 00:29 IST

लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त

लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त आश्वासने देत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट मदत करायची सोडून ते पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करीत असल्याची टिका माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी गुरुवारी लातूर येथील पत्रकार परिषदेत केली. सरकारच्या आठ महिन्याच्या काळात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, २००३-०४ साली पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती होती. त्या वेळी मी महसूलमंत्री असताना चारा छावण्या काढल्या, पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मिटविला. एकही मोर्चा काढण्याची वेळ येऊ दिली नाही. परंतु यंदा मराठवाड्यावर ही वेळ आली तर सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, दुष्काळी स्थितीत जनावरांच्या चारा छावण्या चालविणाऱ्या पुढाऱ्यांनीच कुरण खाल्ले आहे. जनावरांना मिळाले नाही तर तेच मोठे झाले. त्यांचे हे विधान दिशाभूल करणारे आहे. तुम्ही आत्ता काय करणार आहात ते सांगा ? मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. कॅबिनेटच्या बैठकीआधीही ते घोषणा करु शकतात. परंतु मुख्यमंत्री काहीच करित नाहीत. दुष्काळामुळे शेती करणे शेतकरी सोडून देत नाही. १९५१ साली ७२ टक्के लोक शेतीवर अवलंबून होते तर आता ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. सरकारकडे पैसे नाहीत तर सरकारने कर्ज काढावे, वेळकाढूपणा करु नये, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)