शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

दुष्काळाबाबत राज्याचे मुख्यमंत्री संवेदनाहीन

By admin | Updated: April 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : ‘दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना, इकडे शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना पंतप्रधानांनी भेट द्यायची गरज नाही,

औरंगाबाद : ‘दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना, इकडे शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना पंतप्रधानांनी भेट द्यायची गरज नाही, असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरम वाटायला पाहिजे होती. निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदींची दहा-दहा वेळा गरज पडते आणि आता जनता होरपळून निघत असताना ही अनास्था...’अशा तिखट शब्दात आज राज्यसभेच्या माजी सदस्या व माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्या वृंदा कारत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर सिटू भवनात पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, माकप-भाकप विलीनीकरणापेक्षाही आम्ही डावे म्हणून एक पर्याय उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठवाड्यात टँकर आणि चारा लॉबी तयार झाली असून, मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप कारत यांनी केला. दुष्काळग्रस्तांच्या सोयी-सुविधांसाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नसल्याची तक्रारही त्यांनी केली. विभागीय आयुक्तांना वृंदा कारत यांच्यासमवेत कॉ. पी.एस. घाडगे, कॉ. भाऊसाहेब फिरपे, बी. पोटभरे व भुंबे होते.पत्रकार परिषदेस कॉ. पंडित मुंडे, कॉ. उद्धव भवलकर, कॉ, विठ्ठल मोरे, कॉ. योगेश खोसरे, कॉ. भगवान भोजने आदींची उपस्थिती होती.