शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाबाबत राज्याचे मुख्यमंत्री संवेदनाहीन

By admin | Updated: April 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : ‘दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना, इकडे शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना पंतप्रधानांनी भेट द्यायची गरज नाही,

औरंगाबाद : ‘दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना, इकडे शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना पंतप्रधानांनी भेट द्यायची गरज नाही, असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरम वाटायला पाहिजे होती. निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदींची दहा-दहा वेळा गरज पडते आणि आता जनता होरपळून निघत असताना ही अनास्था...’अशा तिखट शब्दात आज राज्यसभेच्या माजी सदस्या व माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्या वृंदा कारत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर सिटू भवनात पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, माकप-भाकप विलीनीकरणापेक्षाही आम्ही डावे म्हणून एक पर्याय उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठवाड्यात टँकर आणि चारा लॉबी तयार झाली असून, मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप कारत यांनी केला. दुष्काळग्रस्तांच्या सोयी-सुविधांसाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नसल्याची तक्रारही त्यांनी केली. विभागीय आयुक्तांना वृंदा कारत यांच्यासमवेत कॉ. पी.एस. घाडगे, कॉ. भाऊसाहेब फिरपे, बी. पोटभरे व भुंबे होते.पत्रकार परिषदेस कॉ. पंडित मुंडे, कॉ. उद्धव भवलकर, कॉ, विठ्ठल मोरे, कॉ. योगेश खोसरे, कॉ. भगवान भोजने आदींची उपस्थिती होती.