शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

मुख्यमंत्री मंत्रालयात नाहीत, पूर्णकाळ अधिवेशन नाही, असे कितीकाळ चालणार; रक्षा खडसे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:41 IST

Raksha Khadase : महिलांना कागदोपत्री नाही तर खरोखर सन्मान द्या. महाराष्ट्रात कुठेही महिला सुरक्षित नाही.

औरंगाबाद : कोरोना काळामुळे शक्ती कायदा करण्यास वेळ नाही मिळाला, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. मात्र, जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात ते अधिवेशन सुद्धा पूर्ण काळ होत नाही. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे. मागील दोन वर्षांचा कालावधी कोरोना काळात गेला, हे मान्य. परंतु, मागील सहा महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी असताना शक्ती कायद्याबद्दल काहीच कसे झाले नाही ? मुख्यमंत्री, अनेक मंत्री मंत्रालयात येत नाहीत, अधिवेशन पूर्णकाळ होत नाही, असे कितीकाळ चालणार असा संतप्त सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राज्य सरकारला केला.

राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि प्रलंबित शक्ती कायद्या यावर भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आज शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, राज्य सरकारच्या दोन वर्षात महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. बीड, परभणी, डोंबिवली, जळगाव येथे लैंगिक अत्याचाराच्या भयंकर घटना घडल्या आहेत. शक्ती कायदा करण्याचे जाहीर झाले मात्र आणखी तो अस्तित्वात आला नाही. महिलांना कागदोपत्री नाही तर खरोखर सन्मान द्या. महाराष्ट्रात कुठेही महिला सुरक्षित नाही. महिला सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पोलीस स्टेशनमध्ये महिलांना अतिशय खराब पद्धतीने वागणूक दिली जाते. महिला अत्याचारात अधिक प्रश्न न विचारता पोलिसांनी थेट एफआयआर दाखल करावा. मात्र, सरकार मागे असल्यानेच पोलीस यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केला. 

केंद्र सरकार कायदे बनवते. तर राज्य सरकारची पोलीस यंत्रणा ती राबवते. मात्र राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पोलीस महिला अत्याचारावर ठोस कारवाई करत नाहीत. युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही अत्याचाराचा आरोप आहे, अशा प्रकरणात सामान्य माणसावर लगेच पोलिसांनी कारवाई केली असती. अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे महाविकास आघाडीने थांबले पाहिजे, असेही खा. खडसे यावेळी म्हणाल्या. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद