शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

‘अंबाला’ पॅटर्नच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतले जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:34 IST

ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे.

ठळक मुद्देऊसतोड मजुरांचे पाल्य राहतात उसाच्या फडातून आणलेल्या विद्यार्थ्यांच्या जाणून घेतल्या समस्या

औरंगाबाद : ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे. यासाठी अंबाला येथे ऊसतोड मंजुरांच्या पाल्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंबाला येथील वसतिगृहाला सायंकाळी ८ वाजता भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या.

ऊसतोडणीला जाण्यापासून परावृत्त केलेले ३३० विद्यार्थी कन्नड तालुक्यातील अंबाला येथील शाळेत आहेत. यातील १४८ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था अंबाला गावात करण्यात आली आहे. हे विद्यार्थी ऊसतोडणीसाठी गुजरात, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आदी ठिकाणी गेले होते. या सर्वांना बालरक्षक पथकांच्या माध्यमातून परत आणण्यात यश आले. दिवाळीनंतर या विद्यार्थ्यांची शाळा सोमवारी (दि.२६) पहिल्यादांच भरली.  याच दिवशी सायंकाळी ८ वाजता जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी कन्नडचे गटशिक्षणाधिरी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करीत सीईओंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  वसतिगृहातील खोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यानंतर विद्यार्थ्यांसोबत पंगतीमध्ये बसून जेवणाचा आस्वादही त्यांनी घेतला. यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केली होती; मात्र विद्यार्थिनींच्या पंगतीला बसूनच त्यांनी जेवण केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मनस्वी आनंद वाटलामागील अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्याची प्रक्रिया सुरू आहे. याठिकाणी  विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून माझ्या सात महिन्यांच्या औरंगाबादेतील कारकीर्दीत आज  मनस्वी आनंद झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, असा विश्वास पवनीत कौर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद