शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

'ब्यूटेन अन् प्रोपेन'ला ऑक्सिजन मिळताच बनतो ज्वालामुखी; छत्रपती संभाजीनगरात दुर्घटना टळली

By राम शिनगारे | Updated: February 2, 2024 20:06 IST

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: ...तर छत्रपती संभाजीनगरात पाच किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी गॅस हा प्रत्येकाच्या घरात चूल पेटविण्यासाठी वापरला जातो. मात्र, त्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज लागते. एलपीजीतील ब्यूटेन आणि प्रोपेन वायूचे २ टक्के मिश्रण हवेत आल्यानंतर त्यास ऑक्सिजनची जोड मिळताच एका चिंगारीमुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर होते. सिडकोतील दुर्घटनेत एलपीजीचे हवेतील प्रमाण ६० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. त्यास ऑक्सिजनची साथ मिळाली होती, मात्र, चिंगारी नसल्यामुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर झाले नाही. तसे काही घडले असते, तर किमान पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता, असा अंदाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधक डॉ. भास्कर साठे यांनी दिली.

एलपीजी गॅसमध्ये ६० टक्के ब्यूटेन आणि ४० टक्के प्रोपेन वायूचे मिश्रण असते. थंड व उच्च दाबाखाली एलपीजी हा द्रवरूपात असतो. त्यास थोडीही उष्णता मिळाल्यास त्याचे वायूमध्ये रूपांतर होते. ब्यूटेन व प्रोपेनच्या मिश्रणात इथाईल मरकॅप्टन हा वायू थोड्या प्रमाणात मिसळल्यानंतर त्याचा उग्र वास येतो. ऑक्सिजन मिळाल्यानंतर हा वायू आगीच्या संपर्कात आल्यास त्याचे रूपांतर ज्वालामुखीत होते. सर्वसाधारण वातावरणात १.८ टक्के ब्यूटेन आणि दोन्ही वायूचे कमीत कमी २ टक्के मिश्रण ब्लास्टसाठी पुरेसे ठरते. सिडकोतील दुर्घटनेत तब्बल ६० टक्क्यापर्यंत एलपीजीचे हवेतील प्रमाण पोहोचले होते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ हवेच्या संपर्कात आला असता तर न भूतो, न भविष्यती, अशी हानी झाली असती, असेही डॉ. साठे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

११ टनच्या दुर्घटनेत ६०० ठार झाले होतेअमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये १९ नोव्हेंबर १९८४ साली एलपीजी गॅसची एक दुर्घटना घडली होती. त्यात गॅस ट्रान्सफर करताना पाईप लिक होऊन गॅस गळती झाली होती. त्यात ६०० लोकांचा मृत्यू, तर ६ हजार जखमी झाले होते. तसेच घटनास्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सिडकोतील दुर्घटनेत टँकरमध्ये तब्बल १८ टन गॅस होता. त्यावरून घटनेची तीव्रता लक्षात येते, असेही डॉ. साठे म्हणाले.

...म्हणून करीत होते पाण्याचा माराटँकरची दुर्घटना झाल्यानंतर त्यावर सहा अग्निशमनाच्या बंबांद्वारे पाण्याचा मारा केला जात होता. त्यात ‘सीओटू’ वायूसुद्धा सोडण्यात येत होता. एलपीजी थंड वातावरण असल्यास त्याचे प्रसरण होत नाही. उष्णता वाढल्यानंतर द्रवरूपातून वायूमध्ये वेगात रूपांतर होते. त्यातच त्याचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो. त्यामुळे ‘सीओटू’चा मारा करून ऑक्सिजन मिळू नये, यासाठीही पाण्याचा वापर केल्याचेही डॉ. साठे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात