शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'ब्यूटेन अन् प्रोपेन'ला ऑक्सिजन मिळताच बनतो ज्वालामुखी; छत्रपती संभाजीनगरात दुर्घटना टळली

By राम शिनगारे | Updated: February 2, 2024 20:06 IST

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: ...तर छत्रपती संभाजीनगरात पाच किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी गॅस हा प्रत्येकाच्या घरात चूल पेटविण्यासाठी वापरला जातो. मात्र, त्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज लागते. एलपीजीतील ब्यूटेन आणि प्रोपेन वायूचे २ टक्के मिश्रण हवेत आल्यानंतर त्यास ऑक्सिजनची जोड मिळताच एका चिंगारीमुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर होते. सिडकोतील दुर्घटनेत एलपीजीचे हवेतील प्रमाण ६० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. त्यास ऑक्सिजनची साथ मिळाली होती, मात्र, चिंगारी नसल्यामुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर झाले नाही. तसे काही घडले असते, तर किमान पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता, असा अंदाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधक डॉ. भास्कर साठे यांनी दिली.

एलपीजी गॅसमध्ये ६० टक्के ब्यूटेन आणि ४० टक्के प्रोपेन वायूचे मिश्रण असते. थंड व उच्च दाबाखाली एलपीजी हा द्रवरूपात असतो. त्यास थोडीही उष्णता मिळाल्यास त्याचे वायूमध्ये रूपांतर होते. ब्यूटेन व प्रोपेनच्या मिश्रणात इथाईल मरकॅप्टन हा वायू थोड्या प्रमाणात मिसळल्यानंतर त्याचा उग्र वास येतो. ऑक्सिजन मिळाल्यानंतर हा वायू आगीच्या संपर्कात आल्यास त्याचे रूपांतर ज्वालामुखीत होते. सर्वसाधारण वातावरणात १.८ टक्के ब्यूटेन आणि दोन्ही वायूचे कमीत कमी २ टक्के मिश्रण ब्लास्टसाठी पुरेसे ठरते. सिडकोतील दुर्घटनेत तब्बल ६० टक्क्यापर्यंत एलपीजीचे हवेतील प्रमाण पोहोचले होते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ हवेच्या संपर्कात आला असता तर न भूतो, न भविष्यती, अशी हानी झाली असती, असेही डॉ. साठे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

११ टनच्या दुर्घटनेत ६०० ठार झाले होतेअमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये १९ नोव्हेंबर १९८४ साली एलपीजी गॅसची एक दुर्घटना घडली होती. त्यात गॅस ट्रान्सफर करताना पाईप लिक होऊन गॅस गळती झाली होती. त्यात ६०० लोकांचा मृत्यू, तर ६ हजार जखमी झाले होते. तसेच घटनास्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सिडकोतील दुर्घटनेत टँकरमध्ये तब्बल १८ टन गॅस होता. त्यावरून घटनेची तीव्रता लक्षात येते, असेही डॉ. साठे म्हणाले.

...म्हणून करीत होते पाण्याचा माराटँकरची दुर्घटना झाल्यानंतर त्यावर सहा अग्निशमनाच्या बंबांद्वारे पाण्याचा मारा केला जात होता. त्यात ‘सीओटू’ वायूसुद्धा सोडण्यात येत होता. एलपीजी थंड वातावरण असल्यास त्याचे प्रसरण होत नाही. उष्णता वाढल्यानंतर द्रवरूपातून वायूमध्ये वेगात रूपांतर होते. त्यातच त्याचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो. त्यामुळे ‘सीओटू’चा मारा करून ऑक्सिजन मिळू नये, यासाठीही पाण्याचा वापर केल्याचेही डॉ. साठे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात