शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

'ब्यूटेन अन् प्रोपेन'ला ऑक्सिजन मिळताच बनतो ज्वालामुखी; छत्रपती संभाजीनगरात दुर्घटना टळली

By राम शिनगारे | Updated: February 2, 2024 20:06 IST

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: ...तर छत्रपती संभाजीनगरात पाच किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी गॅस हा प्रत्येकाच्या घरात चूल पेटविण्यासाठी वापरला जातो. मात्र, त्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज लागते. एलपीजीतील ब्यूटेन आणि प्रोपेन वायूचे २ टक्के मिश्रण हवेत आल्यानंतर त्यास ऑक्सिजनची जोड मिळताच एका चिंगारीमुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर होते. सिडकोतील दुर्घटनेत एलपीजीचे हवेतील प्रमाण ६० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. त्यास ऑक्सिजनची साथ मिळाली होती, मात्र, चिंगारी नसल्यामुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर झाले नाही. तसे काही घडले असते, तर किमान पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता, असा अंदाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधक डॉ. भास्कर साठे यांनी दिली.

एलपीजी गॅसमध्ये ६० टक्के ब्यूटेन आणि ४० टक्के प्रोपेन वायूचे मिश्रण असते. थंड व उच्च दाबाखाली एलपीजी हा द्रवरूपात असतो. त्यास थोडीही उष्णता मिळाल्यास त्याचे वायूमध्ये रूपांतर होते. ब्यूटेन व प्रोपेनच्या मिश्रणात इथाईल मरकॅप्टन हा वायू थोड्या प्रमाणात मिसळल्यानंतर त्याचा उग्र वास येतो. ऑक्सिजन मिळाल्यानंतर हा वायू आगीच्या संपर्कात आल्यास त्याचे रूपांतर ज्वालामुखीत होते. सर्वसाधारण वातावरणात १.८ टक्के ब्यूटेन आणि दोन्ही वायूचे कमीत कमी २ टक्के मिश्रण ब्लास्टसाठी पुरेसे ठरते. सिडकोतील दुर्घटनेत तब्बल ६० टक्क्यापर्यंत एलपीजीचे हवेतील प्रमाण पोहोचले होते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ हवेच्या संपर्कात आला असता तर न भूतो, न भविष्यती, अशी हानी झाली असती, असेही डॉ. साठे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

११ टनच्या दुर्घटनेत ६०० ठार झाले होतेअमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये १९ नोव्हेंबर १९८४ साली एलपीजी गॅसची एक दुर्घटना घडली होती. त्यात गॅस ट्रान्सफर करताना पाईप लिक होऊन गॅस गळती झाली होती. त्यात ६०० लोकांचा मृत्यू, तर ६ हजार जखमी झाले होते. तसेच घटनास्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सिडकोतील दुर्घटनेत टँकरमध्ये तब्बल १८ टन गॅस होता. त्यावरून घटनेची तीव्रता लक्षात येते, असेही डॉ. साठे म्हणाले.

...म्हणून करीत होते पाण्याचा माराटँकरची दुर्घटना झाल्यानंतर त्यावर सहा अग्निशमनाच्या बंबांद्वारे पाण्याचा मारा केला जात होता. त्यात ‘सीओटू’ वायूसुद्धा सोडण्यात येत होता. एलपीजी थंड वातावरण असल्यास त्याचे प्रसरण होत नाही. उष्णता वाढल्यानंतर द्रवरूपातून वायूमध्ये वेगात रूपांतर होते. त्यातच त्याचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो. त्यामुळे ‘सीओटू’चा मारा करून ऑक्सिजन मिळू नये, यासाठीही पाण्याचा वापर केल्याचेही डॉ. साठे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात