शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोककल्याणकारी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानावर ठसा

By सुमेध उघडे | Updated: February 19, 2023 08:58 IST

संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत वादविवादातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देण्यात आला आहे

औरंगाबाद: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे संविधान अनेक वैशिट्यपूर्ण गुणांनी परिपूर्ण आहे. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत वादविवादातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देण्यात आला आहे. संविधान निर्मात्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व आणि प्रशासन हे नक्कीच आदर्श होते हे दिसून येते. संविधानाच्या इंग्रजी हस्तलिखितामध्ये भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास समोर ठेवून एकूण २२ चित्र रेखाटली आहेत. यातील १४१ क्रमांकाच्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे.

‘शिवराय आणि संविधान’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. श्रीकिशन मोरे म्हणतात की,संविधान सभेत दि. ३१ डिसेंबर १९४८ रोजी भावी संविधानात मंत्रिमंडळात नियुक्त होण्यासाठी मंत्र्यांना काही शैक्षणिक अर्हता असावी काय? अशी चर्चा सुरु होती. त्याअनुषंगाने प्रा. के.टी.शहा यांनी मंत्र्यांना सुरुवातीला दहा वर्षे इंग्रजी व नंतरचे दहा वर्षे हिंदी भाषा अवगत असावी अशी दुरुस्ती सुचवली होती. महावीर त्यागी यांनी या सूचनेला नापसंती व विरोध दर्शवला. त्यांनी आपली भूमिका छत्रपती शिवाजी महाराज, रणजीत सिंग व अकबर यांचे शिक्षण आणि त्यांच्या आदर्श प्रशासकीय व्यवस्थेचा दाखला देऊन मंत्री बनण्यासाठी औपचारिक शिक्षण नाही तर पुढाकार, प्रामाणिकपणा, व्यक्तिमत्व, एकात्मता आणि बुद्धिमत्ता हे गुण आवश्यक आहेत असे सभागृहास स्पष्ट करून सांगितले होते. शेवटी हा तिढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात योग्य ती तरतूद करून सोडवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी शेवटचे भाषण झाले. यात त्यांनी भावी संविधान आणि स्वतंत्र भारतासमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना यावर विस्तृत विचार मांडले होते. या देशाच्या स्वातंत्र्याचे भविष्यात काय होईल? ते टिकेल कि जाईल? याची चिंता व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत झालेला त्यांच्याच स्वजनांचा अप्रामाणिक आणि दगाबाजीचा व्यवहार संविधान सभेत गंभीरपणे व्यक्त करून देशाला भविष्यातील त्या संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. या प्रसंगावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान निर्मिती करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटनांचा किती मोठा पगडा होता हे स्पष्ट होते.

१५ व्या प्रकरणापूर्वी शिवाजी महाराजांचे चित्रमहान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी संविधानाच्या प्रत्येक पानावर चौकटीचे नक्षीकाम केले. तसेच चित्रकार बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना २२ समर्पक चित्र रेखाटली आहेत. यातील पान क्रमांक १४१ वर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. यानंतर संविधानाच्या १५ व्या प्रकरणाची सुरुवात होते. यात अनुच्छेद ३२४ नुसार निवडणूक आयोग, लोकप्रतिनिधींची निवड याबाबत उल्लेख आहे. आयोगाने निवडणुका घेणे आणि योग्य लोकप्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रियाचा अंतर्भाव यात होतो. हे लक्षात घेता महान चित्रकार नंदलाल बोस यांनी या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि गुरु गोविंदसिंग यांचे चित्र रेखाटले आहे. चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात शस्त्र असून ते किल्ल्याच्या समोर उभे आहेत. यावरून त्यांची प्रशासनावरील पकड दिसून येते. तसेच जातपात न पाहता केवळ गुणांच्या आधारे योग्य व्यक्ती हेरून शिवाजी महाराजांनी अनेक मावळे घडवले. याच मावळ्यांच्या मदतीने त्यांनी उत्तम प्रशासन राबवले. अनुच्छेद ३२४ मध्ये देखील जनतेच्या प्रतिनिधी निवडीची चर्चा आहे. यातून अभ्यासकांनी आणि संविधान राबविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असेच अधोरेखित होते.

शिवाजी महाराजांची लोकशाहीप्रती दूरदृष्टीछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यात विविध जाती धर्मातील लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व पाहून पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्याला सुसंगत अशा राज्यघटनेतील १५ व्या भागात निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. शिवाजी महाराज यांची लोकशाहीप्रती असलेली दूरदृष्टी संविधानातून प्रतिबिंबित होते. आज त्यांच्या धर्म निरपेक्ष विचारांची नितांत आठवण होते.- प्रा. श्रीकिशन मोरे, उपप्राचार्य, मा. प. विधी महाविद्यालय

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर