शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा वेतनावरील ५ कोटींचा भार वाचला!

By विजय सरवदे | Updated: July 7, 2023 17:00 IST

२६ अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाचा निर्णय होईना

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास १०३ अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्त्याची जबाबदारी शासनाने घेतली. आतापर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जिल्हा परिषद उपकरातून दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च व्हायचा, तो आता वाचला आहे. दरम्यान, आणखी २६ कर्मचाऱ्यांचा निर्णय अजूनही शासनस्तरावर प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदांनी मागील २०- २५ वर्षांपूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात हातपंप दुरुस्ती, नळयोजना कार्यान्वित करणे, दुरुस्तीसाठी अस्थायी स्वरूपात नियुक्त केले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेने जवळपास दीडशेहून अधिक अस्थायी कर्मचारी सेवेत रुजू करून घेतले होते. या अस्थायी कर्मचाऱ्यांचा दरमहा वेतन, भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेच्या उपकरातून करण्यात येत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वत:च्या फंडातून दरवर्षी सुमारे पाच कोटींहून अधिक भार सहन करावा लागत असे. उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत तोकडे असल्यामुळे हा भार सहन होत नसल्याची बाब जिल्हा परिषदेने शासनाला कळविली होती. या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, यासंदर्भात सातत्याने प्रस्ताव सादर करण्यात आले. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदानाचा निधी देण्यास शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ३० जानेवारी २०१३ रोजीच्या निर्णय घेतला होता; मात्र, त्यास मंत्रिमंडळाने आतापर्यंत मंजुरी दिली नव्हती. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे फेब्रुवारी २०२३ पासून या कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात आली. मात्र, यातील २६ कर्मचाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नसल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा, यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अजूनही त्यावर विचार झालेला नाही.

शासनाकडे सतत पाठपुरावाशासनाकडून प्राप्त निधीतून एप्रिलपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतन अदा केले जात आहे. मात्र, उर्वरित २६ कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्यामुळे त्यांच्या वेतनाचा भार अजूनही जिल्हा परिषद प्रशासनाला उचलावा लागत आहे. यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद