शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा वेतनावरील ५ कोटींचा भार वाचला!

By विजय सरवदे | Updated: July 7, 2023 17:00 IST

२६ अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाचा निर्णय होईना

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास १०३ अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्त्याची जबाबदारी शासनाने घेतली. आतापर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जिल्हा परिषद उपकरातून दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च व्हायचा, तो आता वाचला आहे. दरम्यान, आणखी २६ कर्मचाऱ्यांचा निर्णय अजूनही शासनस्तरावर प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदांनी मागील २०- २५ वर्षांपूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात हातपंप दुरुस्ती, नळयोजना कार्यान्वित करणे, दुरुस्तीसाठी अस्थायी स्वरूपात नियुक्त केले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेने जवळपास दीडशेहून अधिक अस्थायी कर्मचारी सेवेत रुजू करून घेतले होते. या अस्थायी कर्मचाऱ्यांचा दरमहा वेतन, भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेच्या उपकरातून करण्यात येत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वत:च्या फंडातून दरवर्षी सुमारे पाच कोटींहून अधिक भार सहन करावा लागत असे. उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत तोकडे असल्यामुळे हा भार सहन होत नसल्याची बाब जिल्हा परिषदेने शासनाला कळविली होती. या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, यासंदर्भात सातत्याने प्रस्ताव सादर करण्यात आले. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदानाचा निधी देण्यास शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ३० जानेवारी २०१३ रोजीच्या निर्णय घेतला होता; मात्र, त्यास मंत्रिमंडळाने आतापर्यंत मंजुरी दिली नव्हती. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे फेब्रुवारी २०२३ पासून या कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात आली. मात्र, यातील २६ कर्मचाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नसल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा, यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अजूनही त्यावर विचार झालेला नाही.

शासनाकडे सतत पाठपुरावाशासनाकडून प्राप्त निधीतून एप्रिलपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्ती वेतन अदा केले जात आहे. मात्र, उर्वरित २६ कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्यामुळे त्यांच्या वेतनाचा भार अजूनही जिल्हा परिषद प्रशासनाला उचलावा लागत आहे. यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद