शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

शरद पवार यांना बदलेलं छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 19:10 IST

तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही.

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर ) : एक वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या आमच्या सरकारने औंरगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचे पहिलं काम केले. मात्र, शरद पवार यांना हे मान्य नसून ते म्हणतात तुम्ही नाव काही करा मी औंरगाबादच म्हणेल; म्हणजे पवारांना छत्रपती संभाजीनगर झालेले नामांतर मान्य नसल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे जल जीवन मिशन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पवारांना उद्देशून बोलतांना फडणवीस पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बदलले व पुन्हा एकदा सर्व सामान्य व शेतकऱ्यांचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. या एक वर्षभरात अनेक विकास काम झाल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देशात सुबत्ता आणण्याचे काम मोदी सरकारने केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांतील कार्यकाळात विकासात्मक योजनांमधून देशात सुबत्ता आली असून सर्व सामान्य जनतेचे यामुळे कल्याण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली आहे. शेतकऱ्यांनाही वर्षाला सहा हजार रुपये किसान योजनेतून देऊन सरकारने पाठबळ दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली असून लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादSharad Pawarशरद पवार