शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

मुंबईतील विमानांच्या गर्दीचा फटका छत्रपती संभाजीनगरला, मुंबईचे विमान मार्चपासून ‘जमिनीवर’

By संतोष हिरेमठ | Updated: February 15, 2024 19:25 IST

हवाई कनेक्टिव्हिटीत होणार घट : प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना बसणार फटका

छत्रपती संभाजीनगर : सकाळच्या वेळेतील एअर इंडियाची मुंबई - छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमानसेवा १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन प्रणालीत ही विमानसेवा काढूनही टाकण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी उड्डाण घेणारे एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील शेवटचे विमान ठरणार आहे. त्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट होणार असून, प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे.

विमानांची गर्दी कमी करण्यासाठी आणि वेळेवर उड्डाण होण्यासाठी सरकारने मुंबई विमानतळाला नियोजित उड्डाणांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. या निर्णयाचा छत्रपती संभाजीनगरला फटका बसला आहे. सध्या इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून मुंबईसाठी सकाळी दोन आणि सायंकाळी एक, अशा एकूण तीन विमानसेवा सुरू आहेत. तिन्ही विमाने प्रवाशांच्या गर्दीने ‘फुल्ल’ असतात. मात्र, आता एअर इंडियाचे विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मार्चपासून मुंबईसाठी सकाळी एक आणि सायंकाळी एक, अशी दाेनच विमाने उपलब्ध राहणार आहेत.

टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने दिलेले निवेदन....

ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी विमान वाहतूक मंत्री, नवी दिल्लीमुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाचा सकाळचा स्लॉट कायम ठेवावा. कारण, या सेक्टरवरील फ्लाइट्समध्ये कपात केल्यास अनेक परदेशी पर्यटकांच्या आगामी प्रवासाचे नियोजन विस्कळीत होईल. पर्यटकांचे ग्रुप, कॉर्पोरेट क्लायंट, व्यावसायिक, आगामी दिवसातील परिषद, विद्यार्थ्यांच्या प्रवासावर परिणाम होईल. अनेकांनी मार्च, एप्रिल आणि त्यापुढील महिन्यांतील प्रवासासाठी अनेक महिने अगोदर त्यांच्या जागा बुक केल्या आहेत. उड्डाणे कमी करण्याच्या या शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाचा केवळ पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रावरच नाही, तर छत्रपती संभाजीनगर शहर आणि आसपासच्या व्यापार, वाणिज्य आणि उद्योगावरही वाईट परिणाम होईल.

पर्यटन, व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या हितासाठी मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई सेक्टरवरील एअर इंडियाच्या फ्लाइटचा सकाळचा स्लॉट पुन्हा द्यावा.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन