शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त

By admin | Updated: April 20, 2015 00:36 IST

राजेश खराडे , बीड यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे

राजेश खराडे , बीडयंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे. तर कडबा २५०० रुपये शेकड्यावर जाऊन पोहचलाय.सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा खळ्यावरील ज्वारी लगेच आडतीवर घालीत असल्याने गेल्या पंधरवाड्यात ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने ज्वारीच्या दराची घसरण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीपाबरोबर रब्बी हे दोन्ही हंगाम गेले. उत्पन्नातून उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत शेवटी ज्वारीचे अल्पशा प्रमाणात का होईना उत्पादन झाले आहे. एकरी ८ पोत्याचा उतारा ३ पोत्यावरच येऊन ठेपल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेती व्यवसायातून बळीराजाला आर्थिक फटकाच अधिक प्रमाणात बसला आहे. सध्या लग्नसराई व दरडोईच्या खर्चापोटी शेतकरी शेतीमाल डायरेक्ट बाजारपेठेत आणून विक्री करीत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील सर्वच पिकांची आवक वाढली आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीच्या केवळ ४ ते ५ पोत्याची आवक होत होती. उत्पादन हाती लागताच येथील बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ज्वारीची ३०० ते ४०० पोत्यांची तर गव्हाची ७० ते ८० पोत्यांची आवक होत आहे. वाढत्या अवकाळीचा परिणाम दरावर झाला असून उत्पादन अल्प प्रमाणात झाले असले तरी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई गडबड केल्याने ज्वारीला १६०० रु. क्विंटल तर गव्हाला २५०० रु क्विंटल दर मिळत आहे. आवक घटताच दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याची गडबड करू नये, असा सल्ला जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.अन बाजार समिती गजबजलीखरीप हंगामातील उत्पादनाची आवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ओसाड पडली हाती. गेल्या पंधरवाड्यापासून रब्बी हंगामातील बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची आवक वाढल्याने समिती परिसरात दुपारी १२ पर्यंत सौदे होऊ लागले आहेत. चौसाळा, राजुरी, पिंपळनेर, मांजरसुंबा, पाली भागातील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.