शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त

By admin | Updated: April 20, 2015 00:36 IST

राजेश खराडे , बीड यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे

राजेश खराडे , बीडयंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे. तर कडबा २५०० रुपये शेकड्यावर जाऊन पोहचलाय.सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा खळ्यावरील ज्वारी लगेच आडतीवर घालीत असल्याने गेल्या पंधरवाड्यात ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने ज्वारीच्या दराची घसरण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीपाबरोबर रब्बी हे दोन्ही हंगाम गेले. उत्पन्नातून उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत शेवटी ज्वारीचे अल्पशा प्रमाणात का होईना उत्पादन झाले आहे. एकरी ८ पोत्याचा उतारा ३ पोत्यावरच येऊन ठेपल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेती व्यवसायातून बळीराजाला आर्थिक फटकाच अधिक प्रमाणात बसला आहे. सध्या लग्नसराई व दरडोईच्या खर्चापोटी शेतकरी शेतीमाल डायरेक्ट बाजारपेठेत आणून विक्री करीत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील सर्वच पिकांची आवक वाढली आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीच्या केवळ ४ ते ५ पोत्याची आवक होत होती. उत्पादन हाती लागताच येथील बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ज्वारीची ३०० ते ४०० पोत्यांची तर गव्हाची ७० ते ८० पोत्यांची आवक होत आहे. वाढत्या अवकाळीचा परिणाम दरावर झाला असून उत्पादन अल्प प्रमाणात झाले असले तरी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई गडबड केल्याने ज्वारीला १६०० रु. क्विंटल तर गव्हाला २५०० रु क्विंटल दर मिळत आहे. आवक घटताच दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याची गडबड करू नये, असा सल्ला जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.अन बाजार समिती गजबजलीखरीप हंगामातील उत्पादनाची आवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ओसाड पडली हाती. गेल्या पंधरवाड्यापासून रब्बी हंगामातील बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची आवक वाढल्याने समिती परिसरात दुपारी १२ पर्यंत सौदे होऊ लागले आहेत. चौसाळा, राजुरी, पिंपळनेर, मांजरसुंबा, पाली भागातील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.