शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

औरंगाबाद जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्‌सचे कार्यालय, ऑप्टिकल्स, टायर विक्री सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:49 IST

corona virus in Aurangabad जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक झाली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन व विविध संघटनांच्या निवेदनांचा विचार करून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देकारवाईसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणारलग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी. मात्र, मनपा, पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक.

औरंगाबाद : जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्‌सचे कार्यालय, सर्व प्रकारचे ऑप्टिकल्स, टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक झाली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन व विविध संघटनांच्या निवेदनांचा विचार करून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेशही जाहीर करण्यात आला.

पश्चिम विभागीय सीए संघटनेने ७ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच त्याचदिवशी सीए संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. शहरातील सीए संघटनेचे अध्यक्ष पंकज सोनी, सीए उमेश शर्मा, प्रवीण बांगड, गणेश शिलवंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागणीचे निवेदन दिले व कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केली. याचा गांभीर्याने विचार करून आजच्या प्राधिकरणच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. याशिवाय ऑप्टिकल्स शॉप, टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, वॉशिंग सेंटर, डेकोर आणि तत्सम दुकाने केंद्रे बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणारसंचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा व अन्य सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. तसेच या पथकांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे.- लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी. मात्र, मनपा, पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक.- अंत्यसंस्कारावेळी हजर राहण्यासाठी २० जणांना परवानगी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद