शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

आडूळ जिप शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अनागोंदी कारभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान ...

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून गैरव्यवहार केला आहे, असा आरोप शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्री भुमरे, जिप सीईओ, शिक्षण उपसंचालक, शिक्षण व आरोग्य सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

पैठण तालूक्यातील आडूळ (बु.) येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यंतची शा‌ळा आहे. या परिसरातील एकमेव उच्च माध्यमिक शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. २०१२ पासून या शा‌ळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चेतना रविंद्र तायडे या कार्यरत आहेत. या शाळेत नवीन नव्यानेच व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. तरी देखील समितीच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर जुन्या अध्यक्षांच्या सहीने सप्टेंबर व ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आडूळ शाखेच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शालेय पोषण आहार व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर पैशाचा आर्थिक व्यवहार केला आहे. तसेच प्रवेश निर्गम उताऱ्यासाठी व शालेय दाखला काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे विना पावती रक्कम वसूल केली जात आहे.

शाळेच्या प्रांगणात गावातील लग्न समारंभ संपन्न होतात. त्यासाठी ग्रामस्थांकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये नियम बाह्य वसूल केले जातात. त्याची शाळेतील कुठल्याही अभिलेखात नोंद झालेली नाही. टीसी, प्रवेश निर्गम व लग्न समारंभाची सदरील जमा झालेली रक्कम ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे. या सर्व अनागोंदी कारभाराची शालेय व्यवस्थापन समितीने विचारणा केली असता मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे मुख्यध्यापिका यांनी शाळेच्या बॉक खात्यावरून परस्पर अफरातफर केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.

यापूर्वी देखील अनेक वेळा ग्रामस्थ, पालक, शाळेतील इतर कार्यरत सर्व शिक्षकांनी व माजी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांची तक्रार देखील प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्याकडे वरिष्ठ पातळीवर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तायडे यांच्यावर कोणाच वरदहस्त आहे. त्यामुळे गैरव्यवहार केल्याचा आरोप असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे.

----------

सदरील प्रकरण अतिशय गंभीर असून यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या पालकांनी, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेस मुख्याध्यापीका चेतना तायडे यांना तोंडी समज देऊन सुद्धा त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी या प्रकरणात लक्ष घालून २०१२ पासून आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. - शुभम पिवळ, पं. स. सदस्य, पैठण.

------------

आम्ही दर महिन्याच्या बैठकीत हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे. परंतू प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी समितीचे समाधान होईल, असे उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयात यासंबंधी तक्रार नोंदविली आहे. शालेय व्यवस्थापन समितीला शाळेच्या व्यवहारात विश्वासात न घेता त्या सध्या शाळेत मनमानी कारभार करीत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. - रंजना गिरी, शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष.

---------

तायडे यांनी बोलण्यास टाळले

याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले. तर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) सुरजप्रसाद जैस्वाल यांच्याशी वेळोवेळी मोबाईलवर कॉल केला असता तसेच व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.