शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

आडूळ जिप शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अनागोंदी कारभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान ...

आडूळ : आडूळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापिकेने मनमानी कारभार करून शालेय पोषण आहार व शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून गैरव्यवहार केला आहे, असा आरोप शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्री भुमरे, जिप सीईओ, शिक्षण उपसंचालक, शिक्षण व आरोग्य सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

पैठण तालूक्यातील आडूळ (बु.) येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यंतची शा‌ळा आहे. या परिसरातील एकमेव उच्च माध्यमिक शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. २०१२ पासून या शा‌ळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चेतना रविंद्र तायडे या कार्यरत आहेत. या शाळेत नवीन नव्यानेच व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. तरी देखील समितीच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर जुन्या अध्यक्षांच्या सहीने सप्टेंबर व ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आडूळ शाखेच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शालेय पोषण आहार व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाळा अनुदान बँक खात्यातून परस्पर पैशाचा आर्थिक व्यवहार केला आहे. तसेच प्रवेश निर्गम उताऱ्यासाठी व शालेय दाखला काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे विना पावती रक्कम वसूल केली जात आहे.

शाळेच्या प्रांगणात गावातील लग्न समारंभ संपन्न होतात. त्यासाठी ग्रामस्थांकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये नियम बाह्य वसूल केले जातात. त्याची शाळेतील कुठल्याही अभिलेखात नोंद झालेली नाही. टीसी, प्रवेश निर्गम व लग्न समारंभाची सदरील जमा झालेली रक्कम ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे. या सर्व अनागोंदी कारभाराची शालेय व्यवस्थापन समितीने विचारणा केली असता मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे मुख्यध्यापिका यांनी शाळेच्या बॉक खात्यावरून परस्पर अफरातफर केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.

यापूर्वी देखील अनेक वेळा ग्रामस्थ, पालक, शाळेतील इतर कार्यरत सर्व शिक्षकांनी व माजी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांची तक्रार देखील प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्याकडे वरिष्ठ पातळीवर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तायडे यांच्यावर कोणाच वरदहस्त आहे. त्यामुळे गैरव्यवहार केल्याचा आरोप असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे.

----------

सदरील प्रकरण अतिशय गंभीर असून यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या पालकांनी, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेस मुख्याध्यापीका चेतना तायडे यांना तोंडी समज देऊन सुद्धा त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी या प्रकरणात लक्ष घालून २०१२ पासून आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. - शुभम पिवळ, पं. स. सदस्य, पैठण.

------------

आम्ही दर महिन्याच्या बैठकीत हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे. परंतू प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांनी समितीचे समाधान होईल, असे उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयात यासंबंधी तक्रार नोंदविली आहे. शालेय व्यवस्थापन समितीला शाळेच्या व्यवहारात विश्वासात न घेता त्या सध्या शाळेत मनमानी कारभार करीत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. - रंजना गिरी, शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष.

---------

तायडे यांनी बोलण्यास टाळले

याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका चेतना तायडे यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले. तर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) सुरजप्रसाद जैस्वाल यांच्याशी वेळोवेळी मोबाईलवर कॉल केला असता तसेच व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.