शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

पालकमंत्री बदलाने औरंगाबादमध्ये कदम गटाचे नगरसेवक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:36 IST

पालकमंत्री रामदास कदम यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी महापालिकेत वार्‍यासारखे पसरले. शिवसेनेतील कदम गटाच्या नगरसेवकांची अवस्था खैबरखिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. महापालिकेत प्रथमच २४ नगरसेवक घेऊन चंचू प्रवेश करणार्‍या एमआयएम पक्षाचीही कदम यांच्यासोबत चांगलीच गट्टी होती. या पक्षाचीही महापालिकेच्या राजकारणात चांगलीच कोंडी होणार आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आॅक्टोबर २०१७ पर्यंत पालकमंत्री कदम यांचेच वर्चस्व होते.शिवसेनेचा महापौर निवडतानाही पालकमंत्र्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

औरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी महापालिकेत वार्‍यासारखे पसरले. शिवसेनेतील कदम गटाच्या नगरसेवकांची अवस्था खैबरखिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. महापालिकेत प्रथमच २४ नगरसेवक घेऊन चंचू प्रवेश करणार्‍या एमआयएम पक्षाचीही कदम यांच्यासोबत चांगलीच गट्टी होती. या पक्षाचीही महापालिकेच्या राजकारणात चांगलीच कोंडी होणार आहे.

२०१४ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आॅक्टोबर २०१७ पर्यंत पालकमंत्री कदम यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेचा महापौर निवडतानाही पालकमंत्र्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्र्यंबक तुपे यांना १५ महिन्यांसाठी महापौर करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीच्या निवडणुकीतही मोहन मेघावाले यांना सभापती करून दिग्गज नगरसेवकांना आणि सेनेतील नेत्यांना कदम यांनी जोरदार धक्का दिला होता. सभागृहनेतेपदी प्रथम राजेंद्र जंजाळ, त्यानंतर गजानन मनगटे यांची वर्णीही त्यांनीच लावली होती. मागील तीन वर्षांपासून महापालिकेत खैरे गटाची अक्षरश: मुस्कटदाबी सुरू होती. हीच अवस्था आणखी काही वर्षे राहिली तर आपली राजकीय कारकीर्द संपेल, अशी भीती खैरे गटाला वाटत होती.

नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत अचानक खैरे गटाने मुसंडी मारत उमेदवारी ओढून आणली. नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडताच खैरे गटाचा उत्साह, विश्वास अधिक वाढला. महापालिकेच्या कारभाराचा रिमोट आपल्या हाती येताच खैरे यांनी कदम यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजनेसाठी कर्ज उभारणे आदी मुद्यांवरून खैरे यांनी थेट मातोश्रीवर वर्तमानपत्रांच्या कात्रणांसह अहवाल सादर केला. पक्षश्रेष्ठींनीही मंगळवारी खैरे गटाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे शहरात खैरे समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

पालकमंत्री रामदास कदम यांनी मागील तीन वर्षांमध्ये मजलीस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला सोबत घेऊन राजकारण केले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कटकटगेट या मुस्लिमबहुल भागात एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र होर्डिंग लागले होते. स्थानिक एमआयएम नेत्यांसह शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांचे फोटोही होर्डिंगवर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अनेकांचा राजकीय अस्तनगरसेवक ते खासदारपदापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी मागील ३० वर्षांमध्ये प्रवास केला आहे. त्यांच्या तीन दशकीय राजकीय कारकीर्दीत जो कोणी अडसर ठरला त्याची उचलबांगडी त्यांनी केली. अनेक नेत्यांचा राजकीय अस्तही झाला.

महापालिकेचे विचित्र राजकारणऔरंगाबाद महापालिकेतील राजकारण हे अत्यंत विचित्र आहे. स्थानिक गुंतागुंती बाहेरच्या नेत्यांना आजपर्यंत कळल्या नाहीत. काँग्रेसच्या तत्कालीन वेगवेगळ्या पालकमंत्र्यांनीही येथील राजकारण पाहून कानाला खडा लावला होता. २०१० ते २०१५ मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा कडेलोट करून सत्ता स्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता; मात्र त्यांना यश आले नव्हते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMuncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण