शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालकमंत्री बदलाने औरंगाबादमध्ये कदम गटाचे नगरसेवक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:36 IST

पालकमंत्री रामदास कदम यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी महापालिकेत वार्‍यासारखे पसरले. शिवसेनेतील कदम गटाच्या नगरसेवकांची अवस्था खैबरखिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. महापालिकेत प्रथमच २४ नगरसेवक घेऊन चंचू प्रवेश करणार्‍या एमआयएम पक्षाचीही कदम यांच्यासोबत चांगलीच गट्टी होती. या पक्षाचीही महापालिकेच्या राजकारणात चांगलीच कोंडी होणार आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आॅक्टोबर २०१७ पर्यंत पालकमंत्री कदम यांचेच वर्चस्व होते.शिवसेनेचा महापौर निवडतानाही पालकमंत्र्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

औरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी महापालिकेत वार्‍यासारखे पसरले. शिवसेनेतील कदम गटाच्या नगरसेवकांची अवस्था खैबरखिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. महापालिकेत प्रथमच २४ नगरसेवक घेऊन चंचू प्रवेश करणार्‍या एमआयएम पक्षाचीही कदम यांच्यासोबत चांगलीच गट्टी होती. या पक्षाचीही महापालिकेच्या राजकारणात चांगलीच कोंडी होणार आहे.

२०१४ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आॅक्टोबर २०१७ पर्यंत पालकमंत्री कदम यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेचा महापौर निवडतानाही पालकमंत्र्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्र्यंबक तुपे यांना १५ महिन्यांसाठी महापौर करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीच्या निवडणुकीतही मोहन मेघावाले यांना सभापती करून दिग्गज नगरसेवकांना आणि सेनेतील नेत्यांना कदम यांनी जोरदार धक्का दिला होता. सभागृहनेतेपदी प्रथम राजेंद्र जंजाळ, त्यानंतर गजानन मनगटे यांची वर्णीही त्यांनीच लावली होती. मागील तीन वर्षांपासून महापालिकेत खैरे गटाची अक्षरश: मुस्कटदाबी सुरू होती. हीच अवस्था आणखी काही वर्षे राहिली तर आपली राजकीय कारकीर्द संपेल, अशी भीती खैरे गटाला वाटत होती.

नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत अचानक खैरे गटाने मुसंडी मारत उमेदवारी ओढून आणली. नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडताच खैरे गटाचा उत्साह, विश्वास अधिक वाढला. महापालिकेच्या कारभाराचा रिमोट आपल्या हाती येताच खैरे यांनी कदम यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजनेसाठी कर्ज उभारणे आदी मुद्यांवरून खैरे यांनी थेट मातोश्रीवर वर्तमानपत्रांच्या कात्रणांसह अहवाल सादर केला. पक्षश्रेष्ठींनीही मंगळवारी खैरे गटाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे शहरात खैरे समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

पालकमंत्री रामदास कदम यांनी मागील तीन वर्षांमध्ये मजलीस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला सोबत घेऊन राजकारण केले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कटकटगेट या मुस्लिमबहुल भागात एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र होर्डिंग लागले होते. स्थानिक एमआयएम नेत्यांसह शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांचे फोटोही होर्डिंगवर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अनेकांचा राजकीय अस्तनगरसेवक ते खासदारपदापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी मागील ३० वर्षांमध्ये प्रवास केला आहे. त्यांच्या तीन दशकीय राजकीय कारकीर्दीत जो कोणी अडसर ठरला त्याची उचलबांगडी त्यांनी केली. अनेक नेत्यांचा राजकीय अस्तही झाला.

महापालिकेचे विचित्र राजकारणऔरंगाबाद महापालिकेतील राजकारण हे अत्यंत विचित्र आहे. स्थानिक गुंतागुंती बाहेरच्या नेत्यांना आजपर्यंत कळल्या नाहीत. काँग्रेसच्या तत्कालीन वेगवेगळ्या पालकमंत्र्यांनीही येथील राजकारण पाहून कानाला खडा लावला होता. २०१० ते २०१५ मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा कडेलोट करून सत्ता स्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता; मात्र त्यांना यश आले नव्हते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMuncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण