शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करा : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 10:12 IST

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.

औरंगाबाद : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या ३० वर्षांतील नाकर्तेपणाचा पाढा वाचत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेत प्रचाराचा नारळ फोडला. तर बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपतर्फे मेनॉर हॉटेलच्या लॉनयर शनिवारी सायंकाळी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेची मागील ३० वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. या काळात शिवसनेने केलेले एक काम दाखवा. शहरात कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. जनतेला जे हवे ते शिवसेनेने उभारले नाही. त्यामुळे आम्हाला महापालिकेतील एकहाती सत्ता द्या, आम्ही मोफत शौचालय व्यवस्था, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी मोफत बससेवा, हॉस्पिटल सेवा देऊ, अशा घोषणा पाटील यांनी करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली आहे. आता घटनेत नसताना मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. अशी ही शिवसेना शहरातील जनतेला सुरक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना हद्दपार करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. तर याच वेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सुद्धा ठाकरे सरकारवर टीका केली. सरकराने 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि केवळ 15 जणांचीच यादी यादी जाहीर केली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.