शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

नाना पटोलेंनी सुनावताच कॉंग्रेस फुटणार म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2022 20:18 IST

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते

औरंगाबाद : शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास आपले सरकार कसे टिकवायचे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत आहे. काँग्रेसचे २० ते २२ आमदार त्यांनी तयार ठेवले आहेत, असा गौप्यस्फोट करणारे विधान शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी करताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरे यांचा समाचार घेत ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, अशी बोचरी टीका केली. पटोले नाराज झाल्याचे कळताच खैरे यांनी त्यांचे विधान मागे घेत सपशेल माफी मागितली.

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संदर्भ देत म्हटले होते की, १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय आल्यास सरकार कसे टिकवायचे, हे फडणवीसांना चांगले माहीत आहे. त्यांनी काँग्रेसचे २०-२२ आमदार तयार ठेवले असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, असे सुनावले. यानंतर खैरे यांनी सपशेल माघार घेत २०-२२ आमदारांसंदर्भात केलेले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. याविषयी खैरे म्हणाले की, माझ्या विधानामुळे पटोले नाराज झाले. ते महाविकास आघाडीचे नेते आहेत. भाजप हे फोडाफोडीचे राजकारण करत असते. यामुळे काँग्रेस पक्षाला सजग करण्यासाठी आपण हे विधान केले होते. परंतु, पटोले नाराज झाल्याने आपण दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेNana Patoleनाना पटोले