शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंनी सुनावताच कॉंग्रेस फुटणार म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2022 20:18 IST

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते

औरंगाबाद : शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास आपले सरकार कसे टिकवायचे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत आहे. काँग्रेसचे २० ते २२ आमदार त्यांनी तयार ठेवले आहेत, असा गौप्यस्फोट करणारे विधान शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी करताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरे यांचा समाचार घेत ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, अशी बोचरी टीका केली. पटोले नाराज झाल्याचे कळताच खैरे यांनी त्यांचे विधान मागे घेत सपशेल माफी मागितली.

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संदर्भ देत म्हटले होते की, १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय आल्यास सरकार कसे टिकवायचे, हे फडणवीसांना चांगले माहीत आहे. त्यांनी काँग्रेसचे २०-२२ आमदार तयार ठेवले असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, असे सुनावले. यानंतर खैरे यांनी सपशेल माघार घेत २०-२२ आमदारांसंदर्भात केलेले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. याविषयी खैरे म्हणाले की, माझ्या विधानामुळे पटोले नाराज झाले. ते महाविकास आघाडीचे नेते आहेत. भाजप हे फोडाफोडीचे राजकारण करत असते. यामुळे काँग्रेस पक्षाला सजग करण्यासाठी आपण हे विधान केले होते. परंतु, पटोले नाराज झाल्याने आपण दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेNana Patoleनाना पटोले