शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:07 IST

लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीची लगबग : प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रनिहाय माहितीचे संकलन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.सूत्रांनी सांगितले की, ७८ केंद्रांवर वीजपुरवठा नाही. तेथे वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात निवडणुका असल्यामुळे मतदान केंद्रावर वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. शिवाय इंटरनेट सेवा सुरळीत मिळावी, यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांशी २ महिन्यांपूर्वी चर्चा झाली आहे. मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काही माहिती घ्यायची असल्यास इंटरनेट सेवा महत्त्वाची असेल. त्यामुळे प्राधान्याने त्यासाठी तयारी केली आहे. पाणीपुरवठा प्रत्येक मतदान केंद्रावर करता येईल, कर्मचाऱ्यांसह मतदारांसाठीदेखील पाणी उपलब्ध होईल, यासाठी आढावा घेण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे मतदान केंद्राबाहेर सावलीची व्यवस्था व्हावी, यासाठी शेड टाकण्यात येणार आहेत. बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत.२३ एप्रिल रोजी मतदान आहे, तोपर्यंत नियोजन करण्यासाठी कालावधी आहे. पाणी, वीज, इंटरनेट सेवा तत्पर ठेवण्याचे सध्या आव्हान असले तरी त्या सुविधा देण्यासाठी तयारी केली जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आहेत. १० एप्रिलपर्यंत यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील मतदान केंद्रविधानसभा मतदारसंघ केंद्रकन्नड ३५१औरंगाबाद मध्य ३१२औरंगाबाद पश्चिम ३३६औरंगाबाद पूर्व २९२गंगापूर २९९वैजापूर ३४६एकूण १९३६

टॅग्स :Electionनिवडणूकwater scarcityपाणी टंचाई