शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या राजधानीत आव्हाने, अपेक्षांच्या डेपोत अडकलेय मनसेचे इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 12:08 IST

Raj Thackeray २२ महिन्यानंतर पक्षप्रमुख शहरात आले आहेत, यापुढे संघटन वाढीची कशी धोरणे असतील, हे आगामी काळात समोर येईल.

- विकास राऊत

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण (MNS ) स्थापन करताना उत्साहाने ओथंबलेले चेहरे आणि स्वप्नांनी चमकणाऱ्या डोळ्यांतून आता खूप काही वजा झाले आहे. स्थापनेपासून सोबत असलेल्या अनेकांनी मनसेची साथ सोडली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत अपेक्षांच्या डेपोत अडकलेले मनसेचे इंजिन आगामी काळात कुठे आणि कसे धावणार, हे मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा पदाधिकारी आढावा बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

विभागासह राजधानीत मनसेच्या रोपट्याला सुरुवातीला पालवी फुटली. परंतु काळाच्या ओघात खतपाणी न मिळाल्यामुळे त्या रोपाचा वटवृक्ष होऊ शकला नाही. मराठवाड्यात सुमारे १५०० पदाधिकारी सध्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जि.प., पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या राजकारणाची घडी विस्कटली आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी मनसेप्रमुख ठाकरे काय करिष्मा करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१२ मध्ये मनसेचे १३ आमदार, नाशिकचा महापौर, मुंबईत २८ नगरसेवक आणि राज्यभरात दोनशेहून जास्त लोकप्रतिनिधी होते. पण ही ताकद फार काळ टिकली नाही. मराठवाड्यात तर पक्षाने बाळसेच धरले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात थोडीफार ताकद निर्माण झाली, परंतु काळाच्या ओघात एकेक बुरुज ढासळत गेल्याने, पक्षाला नवसंजीवनी मिळाली नाही. स्थानिक पातळीवर गटबाजी, कुरबुरी, निवडणूक न लढण्याचे निर्णय यासारखे अनेक कारणांमुळे संघटना मुख्य प्रवाहात आलीच नाही.

मनसेनेला जिल्ह्यात काय मिळाले ?जिल्ह्यात १ आमदार , १ नगरसेवक, ८ जिल्हा परिषद सदस्य, १२ पंचायत समिती सदस्य ही ताकद २००६ नंतर मनसेला मिळाली होती. कन्नडमधून आमदार झालेले नंतर पुढे शिवसेनेत गेले. नगरसेवक भाजपत गेला. २०१२ नंतर अनेक ‘हुकुमी’ निर्णयांमुळे पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढली नाही. २०१५ च्या मनपा निवडणुका लढल्या नाहीत. त्यामुळे शहरी अणि ग्रामीण राजकारणात मनसेची होती-नव्हती, ती ताकदही संपली. वारंवार कार्यकारिणी बरखास्त करणे, मुंबईतूनच संघटना चालविण्याचे प्रकार घडत गेले, त्यामुळे अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. २२ महिन्यानंतर पक्षप्रमुख शहरात आले आहेत, यापुढे संघटन वाढीची कशी धोरणे असतील, हे आगामी काळात समोर येईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद