शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधी खर्चाचे आव्हान; ढिसाळ कारभारामुळे मागील वर्षातील निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:58 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

औरंगाबाद :  मागील आर्थिक वर्षातील बहुतांश अखर्चित निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

साधारणपणे दरवर्षी सिंचन आणि समाजकल्याण विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे या दोन्ही विभागांच्या बैठका घेऊन खर्चाच्या नियोजनासाठी तगादा लावतात. याही वर्षी वेळेत निधी खर्च झाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने विभाग प्रमुखांकडे तगादा लावलेला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, दलित वस्त्यांना कचराकुंडी पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २० लाख रुपये, मागासवर्गीय शेतकऱ्यांना ठिबक संच पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांना दूध व्यवसायासाठी गाय-म्हैस पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये ग्रीन जीम बसविण्यासाठी २७ लाख रुपये, रेशीम शेतीसाठी ३५ लाख रुपये आदी योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

तथापि, गेल्या आर्थिक वर्षातील वैयक्तिक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या लाभार्थ्यांना संबंधित योजनांतर्गत बाजारातून अगोदर स्वत:च्या पैशातून साहित्य खरेदी करायचे आहे; पण दोन महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी केलेले नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

यासाठी समाजकल्याण विभागाने २० आॅगस्ट ही ‘डेडलाईन’ दिलेली आहे. अगोदरचाच निधी अजून खर्च न झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षातला निधी कधी खर्च व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, दर आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी खर्चाचा आढावा व नियोजनाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी बैठका घेत आहेत. सोमवारी २० आॅगस्ट रोजीदेखील याच विषयावर जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिनाभरात निधी मार्गी लागेलयासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षातील बऱ्याच योजना मार्गी लागल्या आहेत. येत्या महिनाभरात २ ते अडीच कोटी निधी खर्च होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षातील समाजकल्याण विभागाच्या काही योजना मार्गी लागल्या आहेत. वेळेच्या आत योजना मार्गी लावण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे यंदा कोणताही निधी अखर्चित राहाणार नाही.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना