शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधी खर्चाचे आव्हान; ढिसाळ कारभारामुळे मागील वर्षातील निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:58 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

औरंगाबाद :  मागील आर्थिक वर्षातील बहुतांश अखर्चित निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. 

साधारणपणे दरवर्षी सिंचन आणि समाजकल्याण विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे या दोन्ही विभागांच्या बैठका घेऊन खर्चाच्या नियोजनासाठी तगादा लावतात. याही वर्षी वेळेत निधी खर्च झाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने विभाग प्रमुखांकडे तगादा लावलेला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, दलित वस्त्यांना कचराकुंडी पुरविण्यासाठी २५ लाख रुपये, वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविण्यासाठी २० लाख रुपये, मागासवर्गीय शेतकऱ्यांना ठिबक संच पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांना दूध व्यवसायासाठी गाय-म्हैस पुरविण्यासाठी ३० लाख रुपये, मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये ग्रीन जीम बसविण्यासाठी २७ लाख रुपये, रेशीम शेतीसाठी ३५ लाख रुपये आदी योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

तथापि, गेल्या आर्थिक वर्षातील वैयक्तिक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या लाभार्थ्यांना संबंधित योजनांतर्गत बाजारातून अगोदर स्वत:च्या पैशातून साहित्य खरेदी करायचे आहे; पण दोन महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी केलेले नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

यासाठी समाजकल्याण विभागाने २० आॅगस्ट ही ‘डेडलाईन’ दिलेली आहे. अगोदरचाच निधी अजून खर्च न झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षातला निधी कधी खर्च व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, दर आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी खर्चाचा आढावा व नियोजनाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी बैठका घेत आहेत. सोमवारी २० आॅगस्ट रोजीदेखील याच विषयावर जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिनाभरात निधी मार्गी लागेलयासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षातील बऱ्याच योजना मार्गी लागल्या आहेत. येत्या महिनाभरात २ ते अडीच कोटी निधी खर्च होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षातील समाजकल्याण विभागाच्या काही योजना मार्गी लागल्या आहेत. वेळेच्या आत योजना मार्गी लावण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे यंदा कोणताही निधी अखर्चित राहाणार नाही.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना