शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

समृद्ध साहित्य निर्मितीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:53 IST

समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : समृद्ध साहित्याचे वाचन माणसाला मर्यादांपासून दूर घेऊन जाते. यासाठी समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली.मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने रविवार, २० आॅगस्ट रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अंबादास जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे शाखाध्यक्ष अमर हबीब, व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अ‍ॅड. शरद लोमटे, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य दगडू लोमटे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे, ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष जि.प.चे सभापती राजेसाहेब देशमुख, साहित्यिका शीतल बोधले, डॉ. सा.द. सोनसळे उपस्थित होते.पुढे बोलताना न्या. जोशी म्हणाले, निकोप लोकशाहीसाठी मतभिन्नता हवी हे सांगून साहित्य क्षेत्रात वकील बांधवांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर राजकारण्यांची परंपरा लाभलेली आहे. साहित्यक्षेत्राला वृद्धिंगत करण्यासाठी यशवंतरावांचे योगदान विसरता येणार नाही. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा ज्या राजकारण्यांनी जोपासला, त्या व्यक्तींची राजकीय विमाने आजही आकाशात उंच उडत आहेत. माणसाचा माणसाशी संबंध तुटू नये. याची काळजी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. परस्परांमध्ये संपर्क व समन्वय न झाल्यास बौद्धिक क्षमता कमी होते, असे जोशी म्हणाले. साहित्य संक्रमित करण्याची पद्धती विकसित झाली पाहिजे. साहित्यिकांनी निर्माण केलेली साहित्यकृती ही पोटच्या अपत्याप्रमाणे असते. मात्र हे अपत्य सुदृढपणे समाजासमोर गेले पाहिजे. याची दक्षताही साहित्यिकांनी बाळगली पाहिजे. आपले लेखन वाचकांना कसे भावेल? हा उद्देश साहित्यातून प्रकट व्हावा. सामाजिक वेदना , सामाजिक जाणिवा व मतभिन्नता दूर करून निकोप साहित्य निर्मिती करण्याचे आव्हान नवसाहित्यिकांसमोर असल्याचे ते म्हणाले. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडावी असे आवाहन माजी न्या. अंबादास जोशी यांनी केले.संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनाने सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे यांनी नूतन अध्यक्षांकडे आपला पदभार सोपवला.मान्यवरांचे स्वागत संमेलनाच्या स्वागताध्यक्षांच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी यांनी केले. आभार अ‍ॅड. पी. जी. जवळबनकर यांनी मानले.