शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पालिका शाळांना चक टीनपत्रांचे शेड गाळ्यांमध्ये

By admin | Updated: March 4, 2015 00:22 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या आठवडाभरात तपासणी करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क टीनपत्रांचे शेड,

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या आठवडाभरात तपासणी करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क टीनपत्रांचे शेड, गाळे किंवा समाजमंदिरातच सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था नसल्याचे उघडकीस आले.शहरातील २१ नगरपालिका शाळांपैकी काही शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या तपासणीमध्ये शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्थाच नसल्याचे उघडकीस आले आहे.जि.प. शिक्षण विभागाच्या पथकाने उर्दू माध्यमातील ५ शाळांची तपासणी केली. यात डबलजीन भागातील शाळा गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. परंतु ही शाळा बंद असल्याचे या पथकाला तेथे गेल्यानंतरच समजले. परंतु मराठी माध्यमांच्या पहिली व दुसरीच्या वर्गात प्रत्येकी एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांना संयुक्तपणे एक मुख्याध्यापक व एक शिक्षक अध्यापन करतात. टाऊनहॉल येथे उर्दू शाळेत दोन विद्यार्थ्यांसाठी एक तर मराठी शाळेत १५ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक कार्यरत असल्याचे आढळून आले.मस्तगड भागातील मराठी व उर्दू माध्यमांचे पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. तेथील मुख्याध्यापक शेख हरूण म्हणाले, या शाळेत ७८ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना अध्यापन करण्यासाठी ६ शिक्षक कार्यरत आहेत. संजयनगर भागातील उर्दू माध्यमाची शाळा समाजमंदिरामध्येच भरविण्यात येत आहे. तेथे पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये एकूण ३२ विद्यार्थी आढळून आले. उपस्थित शिक्षकांनी एकूण विद्यार्थी ३९ असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांना दोन शिक्षक अध्यापन करतात. या शाळेत मात्र विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही.एसआरपीएफ परिसरातील शाळा औरंगाबाद रोडवरील फुकटनगर भागात स्थलांतरित झालेली आहे. येथील पहिली व दुसरी अशा दोन वर्गांसाठी एकूण १७ विद्यार्थी असून ही शाळा चक्क टीनशेडमध्ये सुरू असल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांसाठी तेथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. नवीन मोंढ्याजवळील हिंदनगर भागात तर दोन गाळ्यांमध्येच शाळा सुरू असल्याचे दिसून आले. ही शाळा पूर्वी कादराबाद भागात सुरू होती. परंतु विद्यार्थी न मिळाल्याने २ वर्षांपासून या भागात भरते. या शाळेत पहिली ते तिसरी अशा तीन वर्गांसाठी एकूण विद्यार्थी १५ असून त्यांना २ शिक्षकांमार्फत अध्यापन केले जाते.या पथकातील सदस्य अहेमद नूर यांना विचारणा केली असता, त्यांनी उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये आढळून आलेल्या वरील प्रकारास दुजोरा दिला.