शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचे शुक्रवारपासून चक्काजाम आंदोलन; औरंगाबादमधून साडेचार हजार मालट्रक बंद मध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:06 IST

मालट्रक व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्षवेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार २० जुलैैपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. 

औैरंगाबाद : डिझेलच्या किंमती वाढल्याने कंपन्यांशी करारावर चालणाऱ्या मालट्रकचा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. डिझेलचे भाव कमी करावे किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्षवेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार २० जुलैैपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. 

आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्काजामची हाक दिली आहे. यास औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने संपूर्ण पाठींबा दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष फैैय्याज खान यांनी सांगितले की, मालट्रक देशाच्या रक्तवाहीनी आहेत. ९० टक्के मालवाहतूक मालट्रकद्वारेच होत असते. ट्रकचा ६५ टक्के खर्च डिझेलवर होत असतो. मागील ६ ते ७ महिन्यात डिझेल लिटरमागे १६ रुपयांपर्यंत महागले आहे. मालट्रक व्यवसायिकांचा वर्षभरासाठी कंपन्यांशी करार झालेला असतो. मात्र, तेल कंपन्या दररोज १० ते ३० पैैसे भाववाढ करतात. कंपन्याही एकदम भाववाढून देत नाही. सहा -सहा महिन्यानंतर कंपन्या करारात डिझेलवाढीचा निर्णय घेतात. तोपर्यंत मालट्रक व्यावसायिकांना लाखोरुपयांचा तोटा सहन करावा लागतो. केंद्र सरकारने डिझेलचे भाव कमी करावे. तसेच भाववाढ एकदम करावी नंतर सहा महिने तेच भाव स्थिर ठेवावे. ही  प्रमुख मागणी आहे. २० रोजीच्या संपात देशातील ९५ लाख मालट्रक सहभागी होणार आहेत.  महाराष्ट्रातील २२.५० लाख तर त्यात औैरंगाबादेतील ४.५० हजार ट्रकचा समावेश आहे.

पहिले चार कंपन्यांचे कच्चामाल आणणे व उत्पादीत वस्तू नेणे बंद करण्यात येईल. त्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बंद केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकारने लेखी व तोंडी आश्वासन न देता. आता निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी सुरु केल्यानंतरच मालट्रकचा चक्काजाम आंदोलन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी असद अहमद, जयकुमार थानवी, एम.जी. इरफानी, राजेंद्र माहेश्वरी आदीं मालवाहतूकदारांची उपस्थिती होती. 

मागण्या :- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात यावे.- जीएसटीप्रमाणे एकाच पोर्टलवर आॅनलाईन टोलभरण्याची व्यवस्था करावी. - थर्ड पार्टी इन्शुरन्सचा तिप्पट वाढविलेला  प्रिमियम कमी करावा. - आयकरातील टीडीएस बंद करावे.

टॅग्स :agitationआंदोलनDieselडिझेलGovernmentसरकारbusinessव्यवसाय