शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मालवाहतूकदारांचे शुक्रवारपासून चक्काजाम आंदोलन; औरंगाबादमधून साडेचार हजार मालट्रक बंद मध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:06 IST

मालट्रक व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्षवेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार २० जुलैैपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. 

औैरंगाबाद : डिझेलच्या किंमती वाढल्याने कंपन्यांशी करारावर चालणाऱ्या मालट्रकचा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. डिझेलचे भाव कमी करावे किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्षवेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार २० जुलैैपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. 

आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्काजामची हाक दिली आहे. यास औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने संपूर्ण पाठींबा दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष फैैय्याज खान यांनी सांगितले की, मालट्रक देशाच्या रक्तवाहीनी आहेत. ९० टक्के मालवाहतूक मालट्रकद्वारेच होत असते. ट्रकचा ६५ टक्के खर्च डिझेलवर होत असतो. मागील ६ ते ७ महिन्यात डिझेल लिटरमागे १६ रुपयांपर्यंत महागले आहे. मालट्रक व्यवसायिकांचा वर्षभरासाठी कंपन्यांशी करार झालेला असतो. मात्र, तेल कंपन्या दररोज १० ते ३० पैैसे भाववाढ करतात. कंपन्याही एकदम भाववाढून देत नाही. सहा -सहा महिन्यानंतर कंपन्या करारात डिझेलवाढीचा निर्णय घेतात. तोपर्यंत मालट्रक व्यावसायिकांना लाखोरुपयांचा तोटा सहन करावा लागतो. केंद्र सरकारने डिझेलचे भाव कमी करावे. तसेच भाववाढ एकदम करावी नंतर सहा महिने तेच भाव स्थिर ठेवावे. ही  प्रमुख मागणी आहे. २० रोजीच्या संपात देशातील ९५ लाख मालट्रक सहभागी होणार आहेत.  महाराष्ट्रातील २२.५० लाख तर त्यात औैरंगाबादेतील ४.५० हजार ट्रकचा समावेश आहे.

पहिले चार कंपन्यांचे कच्चामाल आणणे व उत्पादीत वस्तू नेणे बंद करण्यात येईल. त्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बंद केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकारने लेखी व तोंडी आश्वासन न देता. आता निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी सुरु केल्यानंतरच मालट्रकचा चक्काजाम आंदोलन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी असद अहमद, जयकुमार थानवी, एम.जी. इरफानी, राजेंद्र माहेश्वरी आदीं मालवाहतूकदारांची उपस्थिती होती. 

मागण्या :- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात यावे.- जीएसटीप्रमाणे एकाच पोर्टलवर आॅनलाईन टोलभरण्याची व्यवस्था करावी. - थर्ड पार्टी इन्शुरन्सचा तिप्पट वाढविलेला  प्रिमियम कमी करावा. - आयकरातील टीडीएस बंद करावे.

टॅग्स :agitationआंदोलनDieselडिझेलGovernmentसरकारbusinessव्यवसाय