शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:16 IST

मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत आहे

ठळक मुद्दे५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दौराविदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तीन पथके

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत असून, तीन पथके राज्याचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा या असतील. खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. त्या अनुषंगाने शासनाने केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. 

राज्य शासनाच्या मागणीचा ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी पथक औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेईल. ५ रोजी सकाळी ९ वाजेपासून तिन्ही पथके येथून रवाना होतील. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत निर्णय घेतील. पथकात नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी विमानाने औरंगाबादेत येतील. ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान विभागीय प्रशासन आयएमसीटीला येथील दुष्काळी परिस्थितीबाबत अवगत करतील. त्यानंतर तिन्ही पथके नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे प्रस्थान करतील. 

पथक क्र.१या पथकात सहसचिव छवी झा, भोपाळ येथील संचालक ए.के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी औरंगाबाद आणि जालना येथे पाहणी करील. त्यानंतर जालना येथे मुक्कामी थांबेल. ६ रोजी परभणी आणि बीड जिल्ह्यांतील पाहणी करून औरंगाबादेत मुक्कामी असेल. ७ रोजी सकाळी विमानाने मुंबईतील बैठकीला पथकातील सदस्य जातील. 

पथक क्र. २या पथकात एफसीडीचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, मुंबईचे एफसीआयचे डीजीएम एम.जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत जाईल. सोलापूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर ६ रोजी सांगली, सातारा आणि पुण्यातील खरीप क्षेत्राची पाहणी करून पुण्यात मुक्कामी थांबतील. ७ रोजी मुंबईतील बैठकीला हे पथक जाईल. 

पथक क्र. ३या पथकात सहसल्लागार महेश चौधरी आणि एस.सी. शर्मा यांचा समावेश असेल. ५ रोजी हे पथक बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यांत जाईल. पथकाचा जळगावात मुक्काम होईल. त्यानंतर ६ रोजी धुळे व नाशिक जिल्ह्यांतील परिस्थितीचा पथक आढावा घेऊन नाशिकला मुक्कामी थांबेल. ७ रोजी पथक मुंबईतील बैठकीला हजेरी लावील.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती