शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:16 IST

मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत आहे

ठळक मुद्दे५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दौराविदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तीन पथके

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत असून, तीन पथके राज्याचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा या असतील. खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. त्या अनुषंगाने शासनाने केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. 

राज्य शासनाच्या मागणीचा ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी पथक औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेईल. ५ रोजी सकाळी ९ वाजेपासून तिन्ही पथके येथून रवाना होतील. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत निर्णय घेतील. पथकात नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी विमानाने औरंगाबादेत येतील. ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान विभागीय प्रशासन आयएमसीटीला येथील दुष्काळी परिस्थितीबाबत अवगत करतील. त्यानंतर तिन्ही पथके नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे प्रस्थान करतील. 

पथक क्र.१या पथकात सहसचिव छवी झा, भोपाळ येथील संचालक ए.के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी औरंगाबाद आणि जालना येथे पाहणी करील. त्यानंतर जालना येथे मुक्कामी थांबेल. ६ रोजी परभणी आणि बीड जिल्ह्यांतील पाहणी करून औरंगाबादेत मुक्कामी असेल. ७ रोजी सकाळी विमानाने मुंबईतील बैठकीला पथकातील सदस्य जातील. 

पथक क्र. २या पथकात एफसीडीचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, मुंबईचे एफसीआयचे डीजीएम एम.जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत जाईल. सोलापूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर ६ रोजी सांगली, सातारा आणि पुण्यातील खरीप क्षेत्राची पाहणी करून पुण्यात मुक्कामी थांबतील. ७ रोजी मुंबईतील बैठकीला हे पथक जाईल. 

पथक क्र. ३या पथकात सहसल्लागार महेश चौधरी आणि एस.सी. शर्मा यांचा समावेश असेल. ५ रोजी हे पथक बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यांत जाईल. पथकाचा जळगावात मुक्काम होईल. त्यानंतर ६ रोजी धुळे व नाशिक जिल्ह्यांतील परिस्थितीचा पथक आढावा घेऊन नाशिकला मुक्कामी थांबेल. ७ रोजी पथक मुंबईतील बैठकीला हजेरी लावील.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती