शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

केंद्र, राज्य शासनाने निधीसाठी आखाडता हात; महापालिकेला योजनांमधील हिश्श्यासाठी तरतूद करावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:12 IST

पालिकेने रक्कम दिली तरच स्वच्छ भारत अभियानासाठी राज्य शासनाकडून पुढील निधी मिळेल, असे शासनाने पालिकेला कळविले

ठळक मुद्दे पैशांचे सोंग करता येत नाही  स्वच्छ भारत मिशनही सापडले आर्थिक संकटात

औरंगाबाद: केंद्र, राज्य शासन आणि मनपाच्या भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी मिशनचा हिस्सा दिला तरच यापुढे निधी मिळेल, असा हिसका केंद्र सरकारने मनपाला दिला आहे. सोबतच राज्य शासनाचे स्वच्छ भारत मिशनही आर्थिक संकटात सापडल्यामुळे मनपासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

महापालिकेने कोरोनाचा लढा नियोजन समिती आणि शासनाच्या अनुदानावर दिला. शहरातील रस्ते आणि बससेवा केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत आल्याने आता स्मार्ट सिटी मिशनसाठी ‘स्व’ हिश्श्याची रक्कम भरा. ही रक्कम भरली तरच अधिकचा निधी दिला जाईल. असे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला ठणकावले आहे. यापुढील निधी मिळण्याची वाट सुरळीत ठेवायची असेल तर पालिकेला २५० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. स्मार्ट सिटीपाठोपाठ स्वच्छ भारत अभियानही संकटात आले आहे. या अभियानासाठी २५ कोटी रुपये रक्कम वाटा म्हणून मनपाला द्यावी लागणार आहे. पालिकेने रक्कम दिली तरच स्वच्छ भारत अभियानासाठी राज्य शासनाकडून पुढील निधी मिळेल, असे शासनाने पालिकेला कळविले असून २५ कोटी रुपयांची तरतूददेखील करावीच लागेल, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

शहराचा समावेश केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये केलेला असून एक हजार कोटींंचे हे मिशन आहे. यात ५०० कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा तर राज्य शासन व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकारने ५०० पैकी २९४ कोटी तर राज्य शासनाने २५० पैकी १४७ असे ४४१ कोटी रुपये औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिल्याचे कळते. मनपाने २५० कोटींच्या स्वहिश्श्यापैकी एक छदामही स्मार्ट सिटी कामासाठी दिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

एएससीडीसीचे सीईओ काय म्हणाले?मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एएससीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख कुणालकुमार यांचा मनपाच्या हिश्श्यासंदर्भात फोन आला होता. स्मार्ट सिटीसाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम दिली नाही तर अधिकचा निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मनपासमोर २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मोठे आव्हान असून यातून मार्ग काढण्यासाठी विचार सुरू आहे.

स्मार्टसिटीचे मिशन असेमिशनचा एकूण खर्च: १ हजार कोटीकेंद्र सरकार शासनाचा वाटा : ५००राज्य शासनाचा वाटा: २५० कोटीमहापालिकेचा वाटा: २५० कोटीआजवर केंद्राने दिले: २९४ कोटीराज्य शासनाने दिले: १४७ कोटीमहापालिकेने दिले: ००.०० कोटीएकूण आलेले अनुदान: ४४१ कोटी 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGovernmentसरकार