शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केंद्रीय प्रवेश प्रक्रीया, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीला सुरूवात

By योगेश पायघन | Updated: September 25, 2022 17:02 IST

विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आज अखेरची मुदत

औरंगाबाद : राज्यातील चार कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात व्यावसायीक कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तिन फेऱ्या आणि स्पाॅट ॲडमिशन प्रक्रीया १४ नोव्हेंबर पर्यत चालणार आहे. तर ४ नोव्हेंबर पासुन कृषी पदवी अभ्यासक्रम शिकवणीला सुरूवात होईल.

तात्पुरती गुणवत्ता यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जाहीर होईल. त्यावर आनलाईन आक्षेपासाठी ३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून पहिल्या फेरीसाठी जागावाटप ११ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. त्यासाठी रिपोर्टींगचा कालावधी १२ ते १४ ऑक्टोबर देण्यात आला आहेत. दुसऱ्या फेरीचे जागा वाटप १९ ऑक्टोबर रोजी तर रिपोर्टींग१९ ते २१ ऑक्टोबर, तिसऱ्या फेरीचे जागा वाटप २८ऑक्टोबर तर रिपोर्टींग कालावधी २९ ते ३१ ऑक्टोबर देण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीत जागा निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधीत महाविद्यालयात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान उपस्थित राहून कागदपत्रे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील गुणवत्तेनुसार ४ ते ९ नोव्हेंबर प्रवेश फेरी होईल. प्रवेश फेरीची प्रक्रीया महाविद्यालय स्तरावर रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू राहील असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हटले आहे. 

अनुदानीत ३३८० तर विना अनुदानीत १३,२४० जागाराज्यात नऊ अभ्यासक्रमाच्या ३३८० अनुदानीत जागा आहेत. तर विना अनुदानीत सहा अभ्यासक्रमाच्या १३ हजार २४० जागा आहेत. चार कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालये कार्यरत आहेत. सर्वाधिक ७४ महाविद्यालयात बीएसस्सी ऑनर्स कृषी या अभ्यासक्रमाच्या ७,८९० जागा ७४ महाविद्यालयात आहेत. तर बी टेक जैव तंत्रज्ञान १६ काॅलेजमध्ये १२५० जागा, बी टेक अन्न शास्त्र २४ काॅलमध्ये १४८० जागा असून १० काॅलेजमध्ये बीएसस्सी उद्यानविद्याच्या ८४० जागा, बीएसस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या १२ महाविद्यालयात ९०० जागा आहेत. तर बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या १५ महाविद्यालयात ८८० जागा आहेत.

अभ्यासक्रम निहाय अनुदानीत जागा अभ्यासक्रम - महाविद्यालय -जागा बीएस्सी (ऑनर्स कृषी) -२२ -२२४८बीएस्सी (ऑनर्स उद्यानविद्या) -६ -३३२बीएस्सी (ऑनर्स वनशास्त्र) -२ -८२बीएस्सी (ऑनर्स समुदाय विज्ञान) -१- ६०बीएसस्सी (ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन)- १ -६०बीएफसी (फिशरी सायन्स) -१ -४०बी. टेक (अन्न शास्त्र) -३ -१६०बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) -५ -३०४बी. टेक (जैव तंत्रज्ञान) -२ -१००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीStudentविद्यार्थी