शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 18:31 IST

भाजप नेत्यांनी दिल्लीत वजन वापरण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रात वजन असलेल्या भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आणावा, अशा शब्दांत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.

मंगळवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिराच्या लोकार्पण साेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाठ, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी सभापती राजू वैद्य, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेविका अंकिता विधाते, शिल्पा वाडकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून आवडत्या औरंगाबाद शहरात येता आले नाही. त्याची रुखरुख आहे. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. १९८७-८८ मध्ये सांस्कृतिक मंडळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा झाली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजपर्यंत करीत आलोय. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेवर भगवा फडकतोय. तो उतरणारही नाही. नाट्यगृह काळाची गरज होती. आज ‘संत एकनाथ’ला वेगळा साज चढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मी लवकरच पाहणीसाठी येईन. तत्पूर्वी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले.

विकासकामांसाठी जिद्द हवीगुंठेवारीचा प्रश्न, खराब रस्ते, पाणीप्रश्न सोडविण्यात आला. प्रत्येक विषयात मार्ग निघतोच, त्यासाठी जिद्द असायला हवी. औरंगाबादेत भाषणांमध्ये नागरी विषयांना हात घालताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असायचा. शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.साेहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांना पाहून मुख्यमंत्र्यांनी कॅमेरा प्रत्येकावर फिरवायला लावला. हा फोटो काढून मला पाठवा. विकासासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची आपली संस्कृती आहे. मी तिथे असतो तर सर्वांना शाल, श्रीफळ दिले असते. आता येथूनच ई-पुष्प देतोय, त्याचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.

विंचू चावला...रंगमंदिराला नाथांचे नाव आहे. मला ‘विंचू चावला’ भारूड आठवतेय. हा वेगळा विंचू आहे. पूर्वी जंतर-मंतरने तो उतरविला जायचा. नाथांची शिकवण आपण आचरणात आणावी. पैठणला संतपीठ करतोय, चांगले उद्यान करतोय, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ