शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 18:31 IST

भाजप नेत्यांनी दिल्लीत वजन वापरण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रात वजन असलेल्या भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आणावा, अशा शब्दांत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.

मंगळवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिराच्या लोकार्पण साेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाठ, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी सभापती राजू वैद्य, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेविका अंकिता विधाते, शिल्पा वाडकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून आवडत्या औरंगाबाद शहरात येता आले नाही. त्याची रुखरुख आहे. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. १९८७-८८ मध्ये सांस्कृतिक मंडळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा झाली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजपर्यंत करीत आलोय. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेवर भगवा फडकतोय. तो उतरणारही नाही. नाट्यगृह काळाची गरज होती. आज ‘संत एकनाथ’ला वेगळा साज चढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मी लवकरच पाहणीसाठी येईन. तत्पूर्वी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले.

विकासकामांसाठी जिद्द हवीगुंठेवारीचा प्रश्न, खराब रस्ते, पाणीप्रश्न सोडविण्यात आला. प्रत्येक विषयात मार्ग निघतोच, त्यासाठी जिद्द असायला हवी. औरंगाबादेत भाषणांमध्ये नागरी विषयांना हात घालताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असायचा. शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.साेहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांना पाहून मुख्यमंत्र्यांनी कॅमेरा प्रत्येकावर फिरवायला लावला. हा फोटो काढून मला पाठवा. विकासासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची आपली संस्कृती आहे. मी तिथे असतो तर सर्वांना शाल, श्रीफळ दिले असते. आता येथूनच ई-पुष्प देतोय, त्याचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.

विंचू चावला...रंगमंदिराला नाथांचे नाव आहे. मला ‘विंचू चावला’ भारूड आठवतेय. हा वेगळा विंचू आहे. पूर्वी जंतर-मंतरने तो उतरविला जायचा. नाथांची शिकवण आपण आचरणात आणावी. पैठणला संतपीठ करतोय, चांगले उद्यान करतोय, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ