शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

सहा राज्यांतील व्यापाऱ्यांचे केंद्र ‘वडोदबाजार’ !

By admin | Updated: July 1, 2014 01:08 IST

रऊफ शेख , फुलंब्री वडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे.

रऊफ शेख , फुलंब्रीवडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे. महिन्याला सुमारे ३२ कोटींचे खरेदी-विक्री व्यवहार होणाऱ्या या बाजाराने ग्रामपंचायतीला ‘लखपती’ करून टाकले आहे. प्रत्येक सोमवारी हा आठवडी बाजार भरतो. यात प्रामुख्याने जनावरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बैल, गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. या बाजाराची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक, राज्यस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश येथे पोहोचली आहे. तेथील व्यापारी बैल विक्रीसाठी व शेळ्या खरेदीसाठी येतात.राज्यातील कोल्हापूर, कराड, सांगली, सातारा, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर येथील व्यापारी शेळ्या खरेदीसाठी, तर पुणे, जळगाव, पाचोरा, धरणगाव, शेंदुर्णी, शेगाव, खामगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव येथील व्यापारी शेळ्या विक्रीसाठी आणतात.व्यापारी काय म्हणतात?आठवडी बाजारात सुविधांचा अभाव आहे. येथे व्यापाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, थांबण्यासाठी शेड, पाण्याचे हौद होणे आवश्यक आहे. - गोविंद पांडे, ठेकेदारपरराज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी निवासस्थान असणे आवश्यक आहे, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.-फजल अहेमद -बंगळुरू (कर्नाटक) बाजारात सिमेंट रस्ते झाले पाहिजेत, रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे.-हनिफ कुरेशी, शेंदुरवादाव्यापाऱ्यांना थांबण्यासाठी यवस्था व्हावी. एवढ्या राज्यांतून व्यापारी येथे येतात, याचा विचार व्हायला पाहिजे.-नूरखाँ, पिशोरशेळ्यांसाठी प्रसिद्धया आठवडी बाजारात राजस्थानातील काठीवाड जातीची शेळी, उस्मानाबादी शेळी, मध्यप्रदेशमधील देशी शेळी मिळते. बीड येथील शेळ्याचे व्यापारी प्रत्येक आठवड्याला हजारो शेळ्या खरेदी करून थेट चेन्नई येथे नेऊन विकतात. राजस्थानमधील प्रसिद्ध बैलही येथेच मिळतो. दूध उत्पादकांना लागणाऱ्या गायी, म्हशीही सहज उपलब्ध होतात. उत्पन्नात पुढे; सोयी-सुविधांत मागेग्रामपंचायतला या बाजारापासून वर्षाकाठी ६० ते ७० लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय इतर बाजार, व्यापारी गाळे यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नात ग्रामपंचायत जिल्ह्यात अग्रेसर असली तरी विकास मात्र असा तसाच आहे. ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना सुख-सुविधा नाहीत. बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना साधे गेस्ट हाऊसही नाही. बाजारात पिण्याचे शुद्ध पाणी, जनावरांची निटनेटकी व्यवस्थाही नाही.