शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शतकोटी वृक्षलागवड योजनेचा बट्याबोळ !

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

जालना : राज्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षासाठी शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली.

जालना : राज्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षासाठी शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली. परंतु जिल्ह्यात अजूनही मागच्या वर्षीचे वृक्षलागवडीचे उदिष्ट पूर्ण झाले नाही, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ४० टक्केच खड्डे खोदले गेले आहे.ही योजना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण, ग्रामविकास विभाग, वन विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचे संयुक्त प्रयत्न गरजेचे आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असतहनासुद्धा जिल्ह्याचे ४ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, असे विदारक सत्य समोर आले आहे. आता पावसाळा सुरू झाला असला तरी खड्डे खोदण्याचे काम अद्यापही संपले नाही. त्यामुळे यावर्षीही ही योजना कागदावरच राहणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्व तालुक्यात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम संथ गतीने चालू आहे. खड्डे खोदण्यापासून रोपवाटीका निर्मीती, रोपाची लागवड, रोपाच्या संगोपनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्याला दिलेले गतवर्षीचेही उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने नवीन उद्दिष्टाचे का होईल? असा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षी कागदोपत्रीच रोपे लावण्यात आल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या महसूल विभागाला शासनाने कारणे दाखवा नोटिसा पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महसूल विभागाने या योजनेतून अंग काढून घेतले की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. नोटिसा बजावूनही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. वृक्ष संगोपनाच्या बाबतीत सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे ही योजना अजूनही यशस्वी ठरू शकली नाही. दरम्यान, खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत लागवड अधिकारी एम.डी कामकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तीन तालुक्यांत लागवडीला मुहूर्तच नाहीगेल्या वर्षी जिल्ह्याला ४ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, १६ हजार १५० एवढीच रोपे लावण्यात आली. ज्यामध्ये अंबड येथे १९०० रोपे, बदनापूर ६००० , जाफराबाद २२००, जालना २५००, मंठा ३४०० रोपे लावण्यात आली, उर्वरित तीन तालुक्यांनी एक रोपटेही लावले नाही. घनसावंगी, परतूर, भोकरदन या तालुक्यांना गतवर्षी दिलेले उद्दिष्टही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्याला १ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या जिल्ह्याने मागील वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने यंदा कमी उद्दिष्ट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.