शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:55 IST

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात

ठळक मुद्देबलवंत वाचनालयाच्या शताब्दी वर्षास सुरुवातऔरंगाबाद शहरातील पहिले वाचनालय  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ आॅगस्ट १९२० ला स्थापना

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : निजामी राजवटीमुळे शहराची मराठी संस्कृती ढासळतेय की काय, अशी परिस्थिती जवळपास १०० वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे निजामशाहीतही मराठी वाचन संस्कृती टिकून राहावी, मराठी वाचनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद शहरात १ आॅगस्ट १९२० रोजी ‘बलवंत’ वाचनालय सुरू झाले. यंदा हे वाचनालय शताब्दी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर आणि ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी सांगितले की, लक्ष्मणराव नेवासेकर, आनंदकृष्ण वाघमारे, वि. गो. कर्वे, गणपतराव वैद्य, विजयेंद्र काबरा, कृ. वि. भगूरकर, ज. प. मुळे, हनुमंतराव वैष्णव, के. टी. राजन, पु. बा. जोशी, प्र. का. भालेराव, द. र. वैद्य, रमणलाल बाकलीवाल, जुल्फेकार हुसैन या मंडळींच्या संकल्पनेनुसार त्या काळी औरंगाबाद शहरातील या पहिल्या-वहिल्या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या मंडळींसोबत अनेक ज्ञात, अज्ञात लोकांचे सहकार्य या वाचन चळवळीला हातभार लावणारे होते. 

सुरुवातीला शहरवासीयांसाठी वाचनालय हा कौतुकाचा विषय असला तरी ही गोष्ट अगदीच नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्यासाठीही त्या काळात नवनवीन उपक्रम घेण्यात यायचे. साहित्यिकांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन झाल्यावर पुस्तकावर आधारित कार्यक्रम, वाचन कार्यशाळा अशा कार्यक्रमांतून मग वाचक वर्ग जोडला जाऊ लागला आणि ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला. 

सध्या ज्या ठिकाणी हे वाचनालय आहे, त्याच ठिकाणी त्या काळात अगदी लहानशा जागेत वाचनालयाची सुरुवात झाली. वाचनालय नवीन असले तरी त्या काळीही ते साहित्य संपदेने अगदी संपन्न होते. ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार १३० पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन्न होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या काळातही प्रामुख्याने बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे सुरुवातीला ५० बालवाङ्मये वाचनालयात होती. आज ही संख्या ८,७५६ झाली आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमित वाचक आहेत. 

वसंतराव नाईक, रफिक झकेरिया, ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शिवाजी सावंत, ल. श. कुलकर्णी, वा. मा. जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी बलवंत वाचनालयाला भेट दिली आहे. विद्यमान अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल, कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, चिटणीस एस. एम. बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार वाचन संस्कृतीतील बदल स्वीकारून ग्रंथालयाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे.

काळानुसार वाचन संस्कृती बदलत जात आहे. त्यामुळे बलवंत वाचनालयानेही हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अंतर्गत शाळांमध्ये, कारागृहात मोफत पुस्तके देत आहोत. तसेच ‘पेरीफेरल लायब्ररी’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बेरोजगार, वृद्ध मंडळींनी बलवंत वाचनालयातून मोफत पुस्तके घ्यायची, स्वतंत्र ग्रंथालय सुरू करून ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि ठराविक कालावधीने ती बदलून घ्यायची, अशी संकल्पना आहे. 

- डॉ. सुभाष झंवर

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाlibraryवाचनालयAurangabadऔरंगाबाद