शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:55 IST

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात

ठळक मुद्देबलवंत वाचनालयाच्या शताब्दी वर्षास सुरुवातऔरंगाबाद शहरातील पहिले वाचनालय  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ आॅगस्ट १९२० ला स्थापना

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : निजामी राजवटीमुळे शहराची मराठी संस्कृती ढासळतेय की काय, अशी परिस्थिती जवळपास १०० वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे निजामशाहीतही मराठी वाचन संस्कृती टिकून राहावी, मराठी वाचनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद शहरात १ आॅगस्ट १९२० रोजी ‘बलवंत’ वाचनालय सुरू झाले. यंदा हे वाचनालय शताब्दी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर आणि ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी सांगितले की, लक्ष्मणराव नेवासेकर, आनंदकृष्ण वाघमारे, वि. गो. कर्वे, गणपतराव वैद्य, विजयेंद्र काबरा, कृ. वि. भगूरकर, ज. प. मुळे, हनुमंतराव वैष्णव, के. टी. राजन, पु. बा. जोशी, प्र. का. भालेराव, द. र. वैद्य, रमणलाल बाकलीवाल, जुल्फेकार हुसैन या मंडळींच्या संकल्पनेनुसार त्या काळी औरंगाबाद शहरातील या पहिल्या-वहिल्या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या मंडळींसोबत अनेक ज्ञात, अज्ञात लोकांचे सहकार्य या वाचन चळवळीला हातभार लावणारे होते. 

सुरुवातीला शहरवासीयांसाठी वाचनालय हा कौतुकाचा विषय असला तरी ही गोष्ट अगदीच नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्यासाठीही त्या काळात नवनवीन उपक्रम घेण्यात यायचे. साहित्यिकांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन झाल्यावर पुस्तकावर आधारित कार्यक्रम, वाचन कार्यशाळा अशा कार्यक्रमांतून मग वाचक वर्ग जोडला जाऊ लागला आणि ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला. 

सध्या ज्या ठिकाणी हे वाचनालय आहे, त्याच ठिकाणी त्या काळात अगदी लहानशा जागेत वाचनालयाची सुरुवात झाली. वाचनालय नवीन असले तरी त्या काळीही ते साहित्य संपदेने अगदी संपन्न होते. ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार १३० पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन्न होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या काळातही प्रामुख्याने बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे सुरुवातीला ५० बालवाङ्मये वाचनालयात होती. आज ही संख्या ८,७५६ झाली आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमित वाचक आहेत. 

वसंतराव नाईक, रफिक झकेरिया, ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शिवाजी सावंत, ल. श. कुलकर्णी, वा. मा. जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी बलवंत वाचनालयाला भेट दिली आहे. विद्यमान अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल, कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, चिटणीस एस. एम. बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार वाचन संस्कृतीतील बदल स्वीकारून ग्रंथालयाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे.

काळानुसार वाचन संस्कृती बदलत जात आहे. त्यामुळे बलवंत वाचनालयानेही हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अंतर्गत शाळांमध्ये, कारागृहात मोफत पुस्तके देत आहोत. तसेच ‘पेरीफेरल लायब्ररी’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बेरोजगार, वृद्ध मंडळींनी बलवंत वाचनालयातून मोफत पुस्तके घ्यायची, स्वतंत्र ग्रंथालय सुरू करून ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि ठराविक कालावधीने ती बदलून घ्यायची, अशी संकल्पना आहे. 

- डॉ. सुभाष झंवर

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाlibraryवाचनालयAurangabadऔरंगाबाद