शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:55 IST

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात

ठळक मुद्देबलवंत वाचनालयाच्या शताब्दी वर्षास सुरुवातऔरंगाबाद शहरातील पहिले वाचनालय  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ आॅगस्ट १९२० ला स्थापना

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : निजामी राजवटीमुळे शहराची मराठी संस्कृती ढासळतेय की काय, अशी परिस्थिती जवळपास १०० वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे निजामशाहीतही मराठी वाचन संस्कृती टिकून राहावी, मराठी वाचनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद शहरात १ आॅगस्ट १९२० रोजी ‘बलवंत’ वाचनालय सुरू झाले. यंदा हे वाचनालय शताब्दी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर आणि ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी सांगितले की, लक्ष्मणराव नेवासेकर, आनंदकृष्ण वाघमारे, वि. गो. कर्वे, गणपतराव वैद्य, विजयेंद्र काबरा, कृ. वि. भगूरकर, ज. प. मुळे, हनुमंतराव वैष्णव, के. टी. राजन, पु. बा. जोशी, प्र. का. भालेराव, द. र. वैद्य, रमणलाल बाकलीवाल, जुल्फेकार हुसैन या मंडळींच्या संकल्पनेनुसार त्या काळी औरंगाबाद शहरातील या पहिल्या-वहिल्या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या मंडळींसोबत अनेक ज्ञात, अज्ञात लोकांचे सहकार्य या वाचन चळवळीला हातभार लावणारे होते. 

सुरुवातीला शहरवासीयांसाठी वाचनालय हा कौतुकाचा विषय असला तरी ही गोष्ट अगदीच नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्यासाठीही त्या काळात नवनवीन उपक्रम घेण्यात यायचे. साहित्यिकांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन झाल्यावर पुस्तकावर आधारित कार्यक्रम, वाचन कार्यशाळा अशा कार्यक्रमांतून मग वाचक वर्ग जोडला जाऊ लागला आणि ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला. 

सध्या ज्या ठिकाणी हे वाचनालय आहे, त्याच ठिकाणी त्या काळात अगदी लहानशा जागेत वाचनालयाची सुरुवात झाली. वाचनालय नवीन असले तरी त्या काळीही ते साहित्य संपदेने अगदी संपन्न होते. ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार १३० पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन्न होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या काळातही प्रामुख्याने बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे सुरुवातीला ५० बालवाङ्मये वाचनालयात होती. आज ही संख्या ८,७५६ झाली आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमित वाचक आहेत. 

वसंतराव नाईक, रफिक झकेरिया, ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शिवाजी सावंत, ल. श. कुलकर्णी, वा. मा. जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी बलवंत वाचनालयाला भेट दिली आहे. विद्यमान अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल, कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, चिटणीस एस. एम. बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार वाचन संस्कृतीतील बदल स्वीकारून ग्रंथालयाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे.

काळानुसार वाचन संस्कृती बदलत जात आहे. त्यामुळे बलवंत वाचनालयानेही हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अंतर्गत शाळांमध्ये, कारागृहात मोफत पुस्तके देत आहोत. तसेच ‘पेरीफेरल लायब्ररी’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बेरोजगार, वृद्ध मंडळींनी बलवंत वाचनालयातून मोफत पुस्तके घ्यायची, स्वतंत्र ग्रंथालय सुरू करून ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि ठराविक कालावधीने ती बदलून घ्यायची, अशी संकल्पना आहे. 

- डॉ. सुभाष झंवर

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाlibraryवाचनालयAurangabadऔरंगाबाद