शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

औरंगाबादेत गल्लीबोळात होणार सिमेंट रस्त्यांची कामे; मनपा करणार २५३ पैकी १८० रस्ते गुळगुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:50 IST

महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत

औरंगाबाद : महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील तब्बल १८० कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. ही सर्व कामे प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेली असल्यामुळे गल्लीबोळातही आता सिमेंट रस्ते करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती मनपाकडूनच निर्माण करण्यात येत आहे.

यंदा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यामध्ये किमान ६०० कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डात सिमेंट रस्ते करण्यासाठी किमान ४ ते ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. मतदारांना खुश करण्यासाठी सिमेंट रस्ते हा एकमेव पर्याय नगरसेवकांनी निवडला आहे. सिमेंट रस्ते म्हणजेच विकास, असा समज मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा झाला आहे.

शहरातील ११५ वॉर्डांमध्ये आजही ७० ते ८० ठिकाणी ड्रेनेजचे दूषित पाणी वाहत आहे. ड्रेनेज लाईन बदलण्याची तसदी नगरसेवक घेण्यास तयार नाहीत. २५ ते ३० वसाहतींमध्ये मागील सहा महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे नगरसेवकांचा अजिबात कल नाही. शहरातील लाखो नागरिक ज्या डी.पी. रस्त्यांचा सर्वाधिक वापर करतात त्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही.शहरात महापालिकेच्या ताब्यात ११०० किलोमीटरचे प्रमुख रस्ते आहेत. यामध्ये सर्व मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे. वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची लांबी जवळपास ३ हजार किलोमीटर आहे.

मागील दोन वर्षांपासून नगरसेवक वॉर्डातील छोटे-छोटे रस्तेही सिमेंटचे तयार करीत आहेत. रस्ते गुळगुळीत होणे ही चांगली बाब असली तरी त्याचे नेमके प्रमाण किती असावे याचा विचारच प्रशासन करायला तयार नाही. अधिकारी नगरसेवकांना खुश करण्यासाठी तर नगरसेवक मतदारांना खुश करण्यासाठी धडाधड सिमेंट रस्ते तयार करण्यावर भर देत आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा व्हावा एवढीही जागा शिल्लक ठेवायला नगरसेवक तयार नाहीत.

झटपट काम म्हणून...महापालिकेतील बहुतांश कंत्राटदारांनीही आता सिमेंट रस्त्यांच्या कामांकडे मोर्चा वळविला आहे. गल्लीबोळातील सिमेंटच्या रस्त्याचे काम आठ दिवसांत संपते. शहरातील सिमेंट मिक्सर प्लँटमधून रेडिमेड साहित्य आणून एका दिवसात काम संपविता येते. तयार रस्त्यावर फक्त आठ दिवस पाणी पाजल्यावर काम फत्ते होते. दहाव्या दिवशी कंत्राटदार बिल घेऊन मनपाच्या लेखा विभागात हजर असतो.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा