शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीत होतील परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:51 IST

यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसंस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय : जिल्ह्यातील कॉपीमुक्तीसाठी एक पाऊल पुढे

औरंगाबाद : यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षासीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात शनिवारी दुपारी संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक राम भोगले, आमदार सतीश चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, मानसिंग पवार, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, एम.आर. सोनवणे आदींसह संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत काही उपद्रवी परीक्षा केंद्रे आणि केंद्र संचालक बदलण्याच्या निर्णयाला संस्थाचालकांनी उत्स्फूर्तपणे संमती दिली. यावेळी आमदार सतीश चव्हाण म्हणाले, शिक्षण विभागाचेही नियंत्रण महत्त्वाचे आहे. अनेक संस्था अशा आहेत जिथे पन्नास विद्यार्थी क्षमतेची सुविधा नाही; पण परीक्षेच्या काळात तिथे पाचशे विद्यार्थी दिसतात. शिक्षण विभागाने कारवाई केल्यास हे चित्र बदलता येईल. मात्र, कारवाईबाबत शिक्षण विभाग उदासीन आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आम्ही सर्व सहकार्य करू, शिक्षण विभागानेही नियमांची अंमलबजावणी करावी, असेही चव्हाण म्हणाले.यावेळी राम भोगले यांनी शंभर टक्के कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मानसिंग पवार म्हणाले, विनाकारण अडचणी सांगू नका. संस्थाचालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. विद्यार्थी घडवणे, त्याला ज्ञान देण्याचे काम शिक्षण संस्थांचे आहे. सामाजिक परिणामांचाही विचार करायला हवा. वाल्मीक सुरासे म्हणाले, आम्ही कॉपी होऊ देणार नाही. मात्र, त्यासाठी प्रवेश प्रक्रियेला देखील आळा घालायला हवा. वर्षभर शाळेत न येणारे अनेक विद्यार्थी ऐनवेळी परीक्षेला दिसतात.शेवटी शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही प्रशासनाच्या काही चुका असतील, तर त्या स्वीकारतो. मात्र, येणाºया परीक्षेपासून कॉपीमुक्त अभियान कडकपणे राबविण्यात येईल. सर्व केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे असतील. आक्षेपार्ह परीक्षा केंद्र आणि केंद्र संचालक बदलण्यात येतील.परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात ही सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने ठरवले आणि योग्य वेळी कारवाई केली, तरच कॉपीमुक्त परीक्षा होऊ शकतील. यास सर्व संस्थाचालकांनी पाठिंबा दिला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाºया संस्थांवरही शिक्षण विभागामार्फत कारवाई केली जाईल.-शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाcctvसीसीटीव्ही