शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
3
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
4
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
5
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
6
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
7
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
8
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
9
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
10
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
11
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
12
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
13
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
14
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
15
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
16
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
17
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
18
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
19
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

सीसीटिव्ही कॅमेरे आता चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Published: February 18, 2015 12:31 AM

संजय कुलकर्णी , जालना शहरात ३५ चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

संजय कुलकर्णी , जालनाशहरात ३५ चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या दोन सदस्यांनी या कॅमेऱ्यांच्या निकृष्टपणाबद्दल केलेल्या तक्रारीनंतर नगरपालिकेने चौकशी केली. परंतु त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे शहरात ३५ चौकांमध्ये प्रत्येकी दोन असे ७० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ४६ लाख ९८ हजार ३३० रुपयांचा निधी देण्यात आला. सहा महिन्यांच्या मुदतीच्या या कामासाठी साडेपाच महिने पूर्ण झाल्यानंतरही केवळ १६ चौकांमध्येच कॅमेरे सुरू झाल्याचा दावा संबंधित एजन्सीकडून केला जात आहे. ३२ चौकांमध्ये कॅमेरे बसविले होते. ते सुरूही झाले, परंतु नंतर १६ चौकांमधील कॅमेरे बंद पडले. जालना नगरपालिका व पोलीस अधीक्षक कार्यालय अशा दोन्ही कार्यालयांनी मिळून हे काम पूर्ण करावे, असे नियोजन समितीच्या बैठकीत ठरले होते. त्यासाठी नगरपालिका व पोलीस अधीक्षक कार्यालयाची समन्वय समिती असणे आवश्यक होते. परंतु नगरपालिकेने अशा प्रकारची समिती स्थापन न करता परस्पर निविदा प्रक्रिया व कामाचे देयक अदा करण्याचे काम केले आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये नगरपालिकेने हे काम निविदा काढून एका एजन्सीकडे सोपविले होते. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यानुसार २८ फेब्रुवारी २०१५ रोजी या कामाची मुदत संपणार आहे. परंतु गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात १६ चौकांमधील कॅमेरेच सुरू झाले. आतापर्यंतच्या कामाबद्दल नगरपालिकेने संबंधित एजन्सीला २३ लाखांचे म्हणजेच ५० टक्के देयक अदा केले आहे. ज्या एजन्सीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम घेतले आहे, त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी, असे नियोजन समितीच्या सदस्या संध्या संजय देठे यांनी म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकाचौकात बसविण्यात येणारे कॅमेरे हा महत्त्वाचा विषय आहे. परंतु काम पाहिजे, त्या गुणवत्तेने होत नसल्याने आपण नियोजन समितीकडे तक्रार केली.४ कॅमेरे निकृष्ट असल्याबद्दल नियोजन समिती सदस्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात आपण चौकशी करून अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे अहवालासंबंधी आपण काही बोलू शकत नाही, असे नगरपालिका विद्युत विभागाचे अभियंता पोलास यांनी सांगितले. २३ लाखांचे देयक आतापर्यंत संबंधित एजन्सीला अदा करण्यात आल्याचेही ते म्हणाले. ४३५ चौकांमध्ये लागणाऱ्या ७० कॅमेऱ्यांवर जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. मात्र त्यासाठी संबंधित एजन्सीने ३२ इंचीचा एक कलर टिव्ही दिला. त्यावर ७० फुटेजचे नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयानेच त्यांच्याकडील ४० इंची जुन्या कलर टिव्हीची व्यवस्था या फुटेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी केली आहे.