शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पशुपालकांना आता चाऱ्याची चिंता; मोफत वैरण बियाणांसाठी अर्जाचा पाऊस

By विजय सरवदे | Updated: September 22, 2023 14:35 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे पशुपालकांचे ८ हजार ६१० प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : पावसाने डोळे वटारल्यामुळे माळरान ओसाड पडले आहे. जनावरांना पावसाळ्यातच चारा नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यांना खायला काय घालावे, या चिंतेत असलेल्या तब्बल ८ हजार ६१० पशुपालक शेतकऱ्यांनी वैरणीचे मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात गर्दी केली आहे. यापूर्वी २ हजार ६९ पशुपालक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलाभार्थी १५०० रुपये किमतीचे मका, न्युट्रीफिड बाजरी, नेपियर जातीच्या गवताची थोंबे वाटप केले जातात. अलीकडे प्राप्त ८ हजार ६१० प्रस्तावांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असून तांत्रिक मान्यता मिळताच पशुपालकांना वैराणीच्या बियाणांचा पुरवठा केला जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरणीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर वैरणीच्या बियाणांचे वाटप केले जाते. आता खरीप हंगामातही वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर ही योजना राबविली जात आहे. पूर्वी उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी ही योजना राबवली जायची.

काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान?राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर वैरणीचे उत्पादन घेता यावे, म्हणून राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप केले जातात.

योजनेचे निकष काय?लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी. किमान ३ ते ५ जनावरे असावीत, जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावे.

पशुसंवर्धन अधिकारी म्हणतात..पशुपालकांच्या हितासाठी ही योजना चांगली आहे. सन २०२३-२४ या वर्षात ८ हजार ६१० पशुपालक शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेस तांत्रिक मान्यता मिळताच वैरणीसाठी बियाणांचा पुरवठा आदेश देण्यात येईल.- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद