शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

उमेदवार निवांत; कार्यकर्ते-मतदारांमध्ये धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:37 IST

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.

ठळक मुद्देआज निकाल : खैरे, जलील, जाधव, झांबड पैकी बाजी कोण मारणार?

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मागील २० वर्षांमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच सामना पाहायला मिळला. प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना बाजी मारत होती. यंदा हिंदुत्वाचे कार्ड अजिबात चालले नाही. जातीय समीकरणे कधी नव्हे तेवढी प्रभावी ठरली. शहरी आणि ग्रामीण भागात प्रमुख चारही उमेदवारांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.शिवसेना विजयावर ठामयंदा लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची चारही बाजूने कोंडी झाली तरी चंद्रकांत खैरे निवडून येतील, असा ठाम विश्वास सेना नेते व्यक्त करीत आहेत. मतदारांनी पुन्हा एकदा कौल सेनेच्या पारड्यात टाकल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद पश्चिम, कन्नड, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी जमेची बाजू असल्याचेही सांगण्यात येत आहे.बहुजन वंचित आघाडीचा फार्म्युलालोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एमआयएमने या निवडणुकीत अचानक उडी मारून सर्व राजकीय समीकरणे बदलून टाकण्याचा प्रभावी प्रयत्न केला. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून आ.इम्तियाज जलील निवडणूक मैदानात उतरले. दलित, मुस्लिम समाजाने त्यांना तन, मन, धनाने साथ दिली. मुस्लिम मतदारांचा काही प्रमाणात कल पारंपरिक काँग्रेस पक्षाकडे दिसून आला. ही बाब एमआयएमसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शंभर टक्के दलित समाजाने आपले योगदान दिले.ट्रॅक्टरचा निवडणूक फॅक्टरकन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी विद्यमान खासदाराच्या विरोधात मोर्चा उघडला होता. निवडणूक रिंगणात जाधव यांनी उडी घेऊन राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून सोडले. ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली. शहरी भागात तर अर्ध्याहून अधिक भाजप कार्यकर्ते जाधव यांच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे सेनेची अवस्था खैबरखिंडीत अडकल्यासारखी झाली होती. शहरी आणि ग्रामीण भागात जाधव यांनी बऱ्यापैकी जोर लावला. ईव्हीएमपर्यंत किती मतदान नेण्यात आले हे आज स्पष्ट होईल.काँग्रेसने घेतली बरीच मेहनतकाँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनीही यंदा लोकसभा निवडणुकीत बरीच मेहनत घेतली. शहरी भागापेक्षा त्यांनी ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. एमआयएम पक्षापासून दुखावलेला एक मोठा वर्ग काँग्रेसकडे वळाल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात येत आहे. शहरी भागात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यमान भाजप सरकारविरुद्ध नाराजीचा फायदा ग्रामीणमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९