शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार निवांत; कार्यकर्ते-मतदारांमध्ये धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:37 IST

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.

ठळक मुद्देआज निकाल : खैरे, जलील, जाधव, झांबड पैकी बाजी कोण मारणार?

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मागील २० वर्षांमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच सामना पाहायला मिळला. प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना बाजी मारत होती. यंदा हिंदुत्वाचे कार्ड अजिबात चालले नाही. जातीय समीकरणे कधी नव्हे तेवढी प्रभावी ठरली. शहरी आणि ग्रामीण भागात प्रमुख चारही उमेदवारांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.शिवसेना विजयावर ठामयंदा लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची चारही बाजूने कोंडी झाली तरी चंद्रकांत खैरे निवडून येतील, असा ठाम विश्वास सेना नेते व्यक्त करीत आहेत. मतदारांनी पुन्हा एकदा कौल सेनेच्या पारड्यात टाकल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद पश्चिम, कन्नड, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी जमेची बाजू असल्याचेही सांगण्यात येत आहे.बहुजन वंचित आघाडीचा फार्म्युलालोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एमआयएमने या निवडणुकीत अचानक उडी मारून सर्व राजकीय समीकरणे बदलून टाकण्याचा प्रभावी प्रयत्न केला. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून आ.इम्तियाज जलील निवडणूक मैदानात उतरले. दलित, मुस्लिम समाजाने त्यांना तन, मन, धनाने साथ दिली. मुस्लिम मतदारांचा काही प्रमाणात कल पारंपरिक काँग्रेस पक्षाकडे दिसून आला. ही बाब एमआयएमसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शंभर टक्के दलित समाजाने आपले योगदान दिले.ट्रॅक्टरचा निवडणूक फॅक्टरकन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी विद्यमान खासदाराच्या विरोधात मोर्चा उघडला होता. निवडणूक रिंगणात जाधव यांनी उडी घेऊन राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून सोडले. ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली. शहरी भागात तर अर्ध्याहून अधिक भाजप कार्यकर्ते जाधव यांच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे सेनेची अवस्था खैबरखिंडीत अडकल्यासारखी झाली होती. शहरी आणि ग्रामीण भागात जाधव यांनी बऱ्यापैकी जोर लावला. ईव्हीएमपर्यंत किती मतदान नेण्यात आले हे आज स्पष्ट होईल.काँग्रेसने घेतली बरीच मेहनतकाँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनीही यंदा लोकसभा निवडणुकीत बरीच मेहनत घेतली. शहरी भागापेक्षा त्यांनी ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. एमआयएम पक्षापासून दुखावलेला एक मोठा वर्ग काँग्रेसकडे वळाल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात येत आहे. शहरी भागात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यमान भाजप सरकारविरुद्ध नाराजीचा फायदा ग्रामीणमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९